पाणीपुरवठा मंडळाचा प्रस्ताव : राकसकोपची पातळी मागील वर्षापेक्षा साडेतीन फुटाने कमी
प्रतिनिधी / बेळगाव
राकसकोप जलाशयाची पाणी पातळी मागील वर्षापेक्षा साडेतीन फुटाने कमी आहे. जून महिन्यात पाऊस वेळेत न झाल्यास पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच येत्या काही दिवसात 5 दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा विचार पाणीपुरवठा मंडळाने चालविला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाची पाणी पातळी मागील वषीच्या तुलनेत साडेतीन फुटाने कमी आहे. दिवाळी सणाच्या दरम्यान हिडकल जलाशयाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. 15 दिवस हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्या दरम्यान राकसकोप जलाशयातील पाणी उपसा करून शहरवासियांना पुरविण्यात आला. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त पाणी उपसा झाला. परिणामी राकसकोप जलाशयातील पाणीसाठा मागील वषी पेक्षा साडे तीन फुटाने जास्त उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट झाली आहे. जून महिन्यात पाऊस झाल्यास पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही. सध्या मे अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राकसकोप जलाशयामध्ये आहे. मात्र जून महिन्यात पावसाला विलंब झाल्यास शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाने शहराच्या पाणी वितरणात कपात केली आहे. सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र यापुढे पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार पाणीपुरवठा मंडळाने चालविला आहे.
शहरातील कूपनलिका आणि विहिरींद्वारे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र पिण्यासाठी हिडकल आणि राकसकोप जलाशयातील पाण्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हा पाणीपुरवठा महत्त्वाचा असल्याने पाणीपुरवठय़ात कपात करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्मयता
सध्या काही भागात तीन आणि चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र पावसाला वेळेत प्रारंभ झाला नाहीतर पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पाणी टंचाई&च्या काळात पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राकसकोप जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये सहाशे अश्वशक्तीचे दोन विद्युतपंप आणि चारशे अश्वशक्तीच्या एका विद्युतपंपाद्वारे लक्ष्मी टेकडी जलशुद्धिकरण केंद्रात पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठय़ात कपात करण्याच्यादृष्टीने चारशे अश्वशक्तीचा पंप बंद ठेवण्यात आला आहे. तसेच शहरवासियांच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात करण्याचा विचार आहे. यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. सध्या काही भागात तीन दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची झळ बसत नाही. पण आता पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्मयता आहे.
जलाशयात केवळ 16.75 फूट पाणीसाठा
तुडये : मागील वर्षाच्या तुलनेत राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. गुरुवारी सकाळी जलाशय पाणी पातळी 2464.75 फूट इतकी होती. मागील वर्षी याच दिवशी पाणी पातळी ही 2467.95 फूट इतकी होती. जलाशयात आता केवळ 16.75 फूट पाणीसाठा बेळगाव शहराला पुरवठा करण्यासाठी शिल्लक आहे.