नवी दिल्ली
फोन निर्मात्यांच्या संघटनेने केंद्र सरकारला पीएलआय अर्थात उत्पादन आधारीत सवलतीच्या योजनेकरीता अर्जाच्या कालावधीत वर्षाने वाढ करण्याची मागणी केली आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनने सरकारला पाठवलेल्या अर्जात आर्थिक वर्ष 2020-21 हे झिरो इयर गणलं जातं. कोरोनामुळे यावर परिणाम झाला. 5 वर्षाच्या पीएलआय योजनेकरीता अर्ज करण्याच्या कालावधीत 1 वर्षाची वाढ करण्याची मागणी असोसिएशनने पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. फोन निर्मिती कंपन्या स्थानिक उत्पादनावर लक्ष केंद्रीत करीत असले तरी कोरोनामुळे त्यांना अडचणी जाणवत आहेत.