ऑनलाईन टीम / यंगून :
म्यानमारमधील लष्कराच्या बंडानंतर आश्रय घेण्यासाठी भारताच्या ईशान्येकडील मिझोराम राज्यात आलेल्या 2223 लोकांमध्ये म्यानमारचे 14 खासदार असल्याचा दावा एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लष्कराचे आदेश मान्य करायला नकार देऊन म्यानमारच्या 2223 नागरिकांनी आतापर्यंत भारतात आश्रय घेतला आहे. यामध्ये 80 टक्के पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. 20 टक्के सरकारी अधिकारी, शिक्षक आणि अग्निशमन दलातील आहेत. त्यामध्ये 14 खासदारही आहेत. ते म्यानमारच्या चीन राज्य व सांगाग क्षेत्रातील आहेत. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या तिकिटावर नोव्हेंबर 2020 मध्ये ते विजयी झाले होते.