गुरुवारी दुपारी अचानक दुकाने बंद करण्याचे पोलिसांनी दिले आदेश ; नागरिकांमध्ये निर्माण झाली संभ्रमावस्था
वार्ताहर / किणये
राज्यासह बेळगाव परिसरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असल्यामुळे प्रशासनामार्फत सोमवार ते शुक्रवारी रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यू व शुक्रवारी रात्री 9 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याची अंमलबजावणीही गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. मात्र, गुरुवारी दुपारी अचानक बेळगाव शहरासह तालुक्मयाच्या उपनगरातील दुकाने बंद करण्याचा पोलिसांनी सपाटा लावल्यामुळे अनेक व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती.
गुरुवारपासूनच पूर्णपणे लॉकडाऊन झाले की काय? अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू होती. उद्यमबाग, पिरनवाडी परिसरात पोलिसांनी उपस्थित राहून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे नागरिकांमध्ये बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती.
पोलिसांच्या सूचनांचे पालन करत कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक आदी वस्तूंची दुकाने व्यापाऱयांनी बंद केली. तर मेडिकल, भाजी व खाद्यपदार्थांची दुकाने तेवढीच चालू होती. ग्रामीण भागातील काही जण बेळगावला बाजार करण्यासाठी आले होते. मात्र, अचानक दुकाने बंद झाली असल्यामुळे त्यांना अर्धवट बाजार घेऊनच घरी परतावे लागले.
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील अनेक गावांसाठी पिरनवाडी हे केंद्रबिंदू मानले जाते. पिरनवाडी भागात विविध प्रकारची दुकाने निर्माण झालेली आहेत. यामुळे खेडय़ापाडय़ातील लोक पिरनवाडी बाजारात येऊन खरेदी करतात. काही जण लग्नकार्यासाठी कपडे व भांडी खरेदीसाठी आले होते.
मात्र, ही दुकाने बंद करण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्यामुळे बऱयाच जणांना रिकाम्या हातांनी परतावे
लागले.
बेळगुंदी येथील लग्नकार्यात दाखल झाले पोलीस
गुरुवारी विवाह सोहळय़ाचा मुहूर्त असल्यामुळे विविध गावांमध्ये लग्नकार्ये सुरू होती. याच पद्धतीने बेळगुंदी गावातही लग्न समारंभ चालू होता. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचली आणि लग्नासाठी आलेल्या पै-पाहुणे व मित्रमंडळींना सामाजिक अंतर ठेवून मास्कचा वापर करा, अशा सक्तीने सूचना दिल्या. ग्रामीण भागातील लग्नकार्यातही पोलीस पोहोचू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.