रत्नागिरीनजीकच्या निवळीत ग्रामीण पोलिसांची कारवाई; संशयिताला अटक, गुरांसह ट्रक जप्त
रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-बावनदी येथे गोवंशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक ग्रामीण पोलिसांकडून पकडण्यात आल़ा सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी या प्रकरणी एका संशयिताविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल़ी तसेच अवैध वाहतुकीमधील 3 बैल व ट्रक पोलिसांकडून जप्त करण्यात आल़ा.
या प्रकरणी शशांक संजय सावंत (19, ऱा साठरेबांबर रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल़ी या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार 26 डिसेंबर रोजी पोलिसांकडून निवळी येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होत़ी.
निवळी बावनदी येथे वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना बोलेरो ट्रक (एमएच 08 डब्ल्यु 3631) यामध्ये तीन बैल असल्याचे आढळून आल़े यातील वाहनचालक शशांक सावंत याच्याकडे गुरू वाहतूक करण्यासंबंधी परवाना नसल्याचे पोलिसांना आढळल़े त्यानुसार पोलिसांकडून तीन बैल व बोलेरो ट्रक ताब्यात घेण्यात आल़ा तर शशांक याच्याविरूद्ध गुरांची अवैध वाहतूक व पुरपणे वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल़ा या घटनेची खबर ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार मोहन रामचंद्र कांबळे यांनी दिल़ी तर पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे करत आहेत़.