कसबा बीड प्रतिनिधी
शिरोली दुमाला ता करवीर येथे एक तास गावासाठी एक तास देशासाठी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील व हनुमान समुहाच्या वतीने गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधीनी’आपला व आपल्या जवळचा परिसर स्वच्छ असला पाहिजे हा संदेश दिला.म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ ऑक्टोबर २०१४ ला स्वच्छ भारत अभियान सुरू केले. याचाच भाग म्हणून एक तास गावांसाठी श्रमदान कार्यक्रम हनुमान समुहाच्या वतीने आयोजित केले. या श्रमदानाची सुरवात हनुमान समूहाचे सर्व मान्यवर नागरिक एकत्र येऊन भारत माता की जय. अशा घोषणा देत श्रमदान केले.
स्वच्छता अभियान वेळी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील यांनी आपले मनोगतात रोगराई ही अस्वच्छतेने निर्माण होते, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुखी रहावयाचे असेल, आपण आपल घर व आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे सांगितले.
यावेळी हनुमान समुहाचे नेते कुंभी कासारी साखर कारखान्यांचे संचालक किशोर पाटील, बाळासो देसाई,मानसिंग पाटील, एकनाथ पाटील, श्रीकांत पाटील, बाळराजे पाटील व हनुमान समुहाचे प्रमुख कार्यकर्ते, तरुण उपस्थित होते.