शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ व परिसरात एक तास गावासाठी .. एक तास देशासाठी..शिरोळ नगरपरिषद , पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती ,यासह विविध संघटनेच्या वतीने गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधीनी’आपला व आपल्या जवळचा परिसर स्वच्छ असला पाहिजे हा संदेश दिला.म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ ऑक्टोबर २०१४ ला स्वच्छ भारत अभियान सुरू केले. याचाच भाग म्हणून एक तास गावासाठी .. श्रमदान कार्यक्रम विविध संघटनेच्या वतीने आयोजित केले. या श्रमदानाची सुरवात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रांताधिकारी सौ मोसमी चौगुले, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव ,गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे ,अविनाश टारे, यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर नागरिक स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की रोगराई ही अस्वच्छतेने निर्माण होते, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुखी रहावयाचे असेल, आपण आपल घर व आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून प्रत्येकाने आपापले अंगण दररोज स्वच्छ करावे यावेळी स्वच्छतेबाबतीची सामूहिक शपथ घेण्यात आली विविध संघटनेचे पदाधिकारी,पत्रकार, प्रमुख कार्यकर्ते, तरुण उपस्थित होते.