वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नव्या ग्राहकनोंदणीसह इतर कारणांनी भारती एअरटेलच्या जूनअखेरच्या तिमाहीत नफ्यात चांगली वाढ दिसली आहे. पण तरीही अंदाजाइतका नफा प्राप्त करण्यात मात्र कंपनीला अपयश आल्याचे बोलले जाते.
देशातील दुसऱया नंबरची मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने जून 2022 अखेरच्या तिमाहीत 1606 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला असल्याचे समजते. अंदाजापेक्षाही नफा तसा कमीच नोंदला गेला असल्याचे सांगितले जात आहे. 1900 कोटी रुपयांचा नफा होणार असल्याचा अंदाज बांधला जात होता.
यामुळे वाढला नफा
4 जी वापरकर्त्यांची वाढती संख्या, डाटा वापरात झालेली वाढ, नव्या ग्राहकांची भर यासाऱयाचा सकारात्मक परिणाम मागच्या तिमाहीतील नफ्यावर दिसला. पहिल्या तिमाहीत हा नफा 467 टक्के अधिक असल्याचे सांगितले जाते.