पुणे / प्रतिनिधी :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली नऊ वर्षे एका पक्षाचे पूर्ण बहुमत असलेले एनडीए सरकार आहे. त्यामुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले. लोकांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास ही आमची मोठी ताकद आहे. 2024 साली लोकसभा निवडणुकीत 350 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला आणि एनडीए ला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपचे माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी येथे व्यक्त केला.
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जावडेकर म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी विकासाचे सकारात्मक राजकारण केले. विकासाचा लाभ देण्यात जात, धर्म, प्रांत, लिंग, मतदाराचा कल या कोणत्याही कारणावरून भेद केला नाही. जनतेनेही स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास, या सूत्रावर मोठी प्रगती झाली.
2004 ते 2014 या कालखंडात विविध शहरात होणारे बॉम्बस्फोट संपले, माओवाद्यांचा प्रभाव 90 टक्के कमी झाला. जम्मू काश्मीर व पूर्वोत्तर राज्यात विकास व शांतता वाढली. 7 लाख उत्पन्नावर आता आयकर भरावा लागत नाही. रेरा, सेल्फ टेस्टेशन, शासकीय सेवा ऑनलाईन, फेस लेस सेसमेंट, ई रिटर्न फायलींग, 15 दिवसात रिफंड, मूलभूत सुविधांचा विकास आणि 1 लाख रेराअंतर्गत तक्रारीचा झटपट निपटारा याशिवाय अपूर्ण घरबांधणी प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी 25 हजार कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले. आर्थिक प्रगतीमुळे विकास व रोजगाराच्या संधी वाढल्या, असेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या विकासाचा वेग 7 टक्के आहे. आपली निर्यात सतत वाढून ती 750 बिलियन यापेक्षा जास्त झाली, परकीय चलनाची गंगाजळी अत्युच्च पातळीवर आहे. यामुळे भारत हे जगात होणाऱया गुंतवणुकीचे आकर्षण केन्द बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक चमकता तारा म्हणून ओळखला जातो. औद्योगिक, शेती आणि सेवा क्षेत्रांचा सतत विकास, मजबूत मागणी आणि सुधारणा यामुळे हे घडून आले. 50 हजार किमी. चे नवे हायवे, 4 लाख किमी. चे ग्रामीण रस्ते, 70 नवे विमानतळ आणि 111 नवे जलवाहतुक मार्ग, 20 शहरात मेट्रोची प्रगती, 18 वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे मध्ये मोठी गुंतवणूक, सुमारे 70 छोटय़ा बंदरांची निर्मिती, उडान योजना, स्वच्छ रेल्वे स्टेशन, हा प्रत्यक्ष विकास सर्व जगात वाखाणला जातो, असेही त्यांनी सांगितले.
खतांच्या अनुदानात 5 पट वाढ, शेती अर्थसंकल्पात 5 पट वाढ, 10 कोटी शेतकऱयांना मृदा संधारण कार्ड, 20 लाख कोटींचे शेती कर्ज या सर्वाचा परिणाम धान्य उत्पादन व निर्यात वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या 5 स्थानांचा विकास, सरदार पटेल व नेताजी बोस यांचे पुतळे अशी अनेक कामे 9 वर्षात झाली. प्रधानमंत्री नरेन्द मोदी यांची ‘देश प्रथम’ निती त्यासाठी सतत कष्ट आणि ‘सन्यस्त कर्मयोगी’ ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे. नऊ वर्षाच्या कामाचा अहवाल 20 कोटींहून अधिक घरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देणार आहेत, असेही जावडेकर यांनी नमूद केले.