कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “सध्या एक टिंग्या रोज बोलतोय त्या टिंग्याला काय माहिती की हऱ्या नाऱ्याचे उद्योग काय होते. या टिंग्याने जर उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद नाही केलं तर त्याला जनतेला सामोरे जावे लागेल.” असे बोलून त्यांनी निलेश ऱाणे यांच्यावर टिका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमच्या काळात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही मात्र शिंदे फडणवीस सरकार येताच मोठ्या प्रमाणात दंगली घडत आहेत. राज्यात होणाऱ्या दंगली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं फेल्युअर आहे.”
तसेच छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम जनता ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीत येण्यासाठी धडपड सुरू आहे. चुकून खासदार झालेल्या इम्तियाज जलीलला आम्ही कधीही महाविकास आघाडीत घेणार नाही आणि तो येण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी प्रखर विरोध करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शेवटी बोलताना त्यांनी “येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात दंगली घडवायचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे स्वागत करण्याचं कारण काय होतं ? शिवप्रेमींच्या भावना दुखवायचं काम भाजप करत आहे.” असा आरोप त्यांनी केला.