पणजी : येत्या 6 जून रोजी शाळा सुरू होणार असून त्यासाठी आता केवळ 15 दिवस (दोन आठवडे) बाकी आहेत. या कालावधीत पहिली ते आठवीच्या मुलांना वेळेवर पुस्तके उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे. ते म्हणाले की पुस्तकांचे कंत्राट देण्यात आले असून 30 मेपर्यंत तरी पुस्तके मिळणार आहेत. मागील पुस्तके उशिरा मिळाली त्यास अनेक कारणे होती. कागद महाग झाला आणि तो मिळत नव्हता अशी तेव्हाची परिस्थिती होती. त्यासाठी ज्यादा पैसे मागण्यात आले ते देण्यास उशीर झाला म्हणून पुस्तके उशिरा मिळाल्याचा खुलासा त्यांनी केला. यापुर्वीचे 5 वर्षाचे कंत्राट संपुष्टात आले असून यंदा नव्याने निविदा काढून नवीन कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार 30 मेपर्यंत पुस्तके मिळाली पाहिजेत अशी अट घालण्यात आली असून त्या तारखेपर्यंत मिळतील, अशी आशा त्यांनी वर्तवली. पास झालेल्या मुलांची पुस्तके घेऊन ती गरजेनुसार मुलांना देण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या शिवाय ‘दिक्षा’ पोर्टलवर सर्व इयत्तेची पुस्तके उपलब्ध असून ती हवी तर डाऊनलोड करून वापरता येऊ शकतात. या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. यंदा पुस्तकांना उशीर होणार नसल्याचा दावा झिंगडे यांनी केला असून ती वेळेवर मिळतील अशी खात्री वर्तवली आहे.
Previous Articleकर्नाटकप्रमाणे देशाचे चित्रही बदलेल; शरद पवार यांचा विश्वास
Next Article नगराध्यक्ष-नगरसेवकांच्या मानधनात लवकरच वाढ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.