प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूरकर लय भारी, कसे आहात, काटा कीर … नाद खुळा अशा अस्सल कोल्हापुरी रांगड्या भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात भाषणाला सुऊवात केली. तपोवन मैदानात कार्यक्रमासाठी झालेली गर्दी पाहून त्यांनी कोल्हापूरकरांचे भरभरून कौतुक केले. कोल्हापूरकरांनी विषय हार्ड केला, जिकडे पहावे तिकडे गर्दी आहे. ही गर्दी पाहून विरोधकांची ‘टांगा पलटी घोडे फरार’ होणार असा टोलाही त्यांनी लगावला.
शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तपोवन येथील मैदानात हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुऊवातच कोल्हापूरच्या रांगड्या स्टाईलने सुरू केले.. नाद खुळा, काटा कीर.. कोल्हापूरकरांचा विषय हार्ड असल्याचे सांगताच सभेच्या ठिकाणी शिवसेना, भाजपच्या कायकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी कार्यक्रमासाठी झालेल्या गर्दीचा दाखल घेत विरोधकांवरही निशाना साधला. या मैदानावर आतापर्यंतच रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे.त्यांनी कोल्हापूरकरांचे कौतुकही केले. कोल्हापूरकरांची अपुलकी ही जगात ओळखली जाते. कोल्हापूरची माती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. कोणतेही संकट आले तर कोल्हापूरकर निधड्या छातीने सामना करतात.
एका बैठकीतच टोल प्रश्न निकाली
कोल्हापूर जनता जगात भारी आहे. नेहमी मागण्यासाठी आग्रही असतात. कोल्हापूरकरांच्या आंदोलनामुळेच टोल नाके हटविले गेले. टोल बंद करणारा मंत्री आपणच होतो. आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पहिल्याच बैठकीत माझ्या स्वभावाची झलक पाहून कंपनीने टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला. 473 कोटी देण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानेच कोल्हापूरचा टोलमाफ झाला.
कोल्हापूरला 11 महिन्यांत 732 कोटी
राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. विकासकामांसाठी भरीव निधी दिला आहे. 11 महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज, हातकंणगलेसह कोल्हापूर शहरातील विकासकामांसाठी 762 कोटींचा निधी दिला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.