खोदकामामुळे गटारी तुंबल्या : कामे तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांसह व्यापाऱयांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेतील विविध रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. काही रस्त्याचे काम अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एसपीएम रोडवरील रस्त्याचे काम अर्धवट असतानाच आता याठिकाणी ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. येथील घालण्यात आलेले पेव्हर्स हटविण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. खोदाई करून महिना होत आला तरी हे काम अर्धवट असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एसपीएम रोडचे काम तीन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. कोणती ना कोणती कामे शिल्लक असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपूल ते शिवाजी उद्यानापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. पण सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम व्यवस्थित झाले नाही. अशातच रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर्स घालण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलानजिक रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अडचणीचे बनले होते, त्यामुळे याठिकाणी काही भागात पेव्हर्स घालून रस्ता व्यवस्थित करण्यात आला होता. पण काही ठिकाणी डेनेज वाहिन्याची समस्या निर्माण झाल्याने रस्ता खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. एसपीएम रोडच्या शेजारी डेनेज वाहिन्या घालण्यात येत आहेत, पण येथील घालण्यात आलेले पेव्हर्सदेखील काढण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे.
सदर काम सुरू करून दोन महिने झाले, पण डेनेज वाहिन्या घालण्याचे काम अर्धवट आहे. रस्त्याशेजारी खोदाई करून ठेवण्यात आल्याने ग्राहक आणि रहिवाशांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहे. गटारीमध्ये सांडपाणी साचत असल्याने रहिवाशांना नाहक त्रास होत असून आरोग्य धोक्मयात आले आहे. त्यामुळे खोदण्यात आलेल्या ठिकाणी डेनेज वाहिन्या घालून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.