कडोली येथील मराठी शाळेत पालक मेळाव्यात शिक्षकांचे मत, प्रश्नोत्तरे-चर्चांमुळे रंगला मेळावा
कडोली / वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांबरोबर पालकांचे मह।वही मोठे आहे. जर पालकांनी सामंजस्याने मुलांना आचार, विचार व बौध्दिकतेच्या दृष्टिने समजविल्यास भविष्यातील धोका टाळता येतो. त्यामुळे शिक्षक व पालकांनी एकत्रित येवून मुलांच्या चुकांबरोबरच त्यांच्या चांगल्या गुणांना वाव दिल्यास विद्यार्थी नक्कीच यशस्वी होवू शकतो, असे विचार शिक्षक एम. आर. पाटील व इतर शिक्षकांनी व्यक्त केले.
कडोली येथील गव्हर्मेंट मराठी मॉडेल प्रायमरी स्कूलमध्ये शनिवारी पालकमेळावा घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अनिल डंगरले होते. पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी सातवीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. दीपप्रज्वलन शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक आर. बी. अलगुडेकर यांनी करून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाय देण्यासाठी आपणे शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. यामध्ये पालकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्या मुलांना प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे असे म्हणाले. संभाव्य परिस्थिती विद्यार्थ्यांना हुषार व शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. त्यामुळे सर्वांचे सहकार्य मोलाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
चर्चा व प्रश्नोत्तरामध्ये एम. आर. पाटील यांनी सहभाग घेतला. जे. के. कोळकर व आर. के. नाईक यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एम. आर. पाटील यांनी केले. जी. वाय. ताशिलदार यांनी आभार मानले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, नागेंद्र पाटील, विजय बसरीकट्टी, अमोल ऊटकुटे, केशव मस्कार, राजू उच्चुकर, सविता संभाजी, सविता चौगुले, वर्षा कासार, लक्ष्मी बोकडे आदी उपस्थित होते.