आर.आर.आबा पाटील स्वच्छ गाव स्पर्धेत प्रथम क्रमांक
प्रतिनिधी/ मेढा
पद्मावती देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चोरांबे या गावाने आर. आर. पाटील स्वच्छ गाव स्पर्धेत जावली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
माता पद्मावतीचे आर्शिवादाने,चोरांबे गावचे सुपुत्र व माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली , सरपंच विजय बापू सपकाळ यांचे नियोजनबद्द शांत संयमी स्वभावामुळे सर्वांना एकत्र सोबत घेवून खुप परिश्रम घेतल्या मुळे गावाला हे यश प्राप्त झाले आहे. गावातील तरुणांची जिद्द, गावात असलेली एकी, जेष्ठ नागरीकांचा आर्शिवाद, उत्सुफुर्त असा महिलांच्या सहभागामुळे गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले.
गावातील लोकांनी स्वखर्चाने रंगवलेली घरे तसेच दरवाजावर पती – पत्नीचे असणार्या नावाची पाटी येणारे लोकांची मने वेधून घेते . खासकरून दरवाजावर घरच्या लक्ष्मीचे अर्थात पत्नीचे पहीले नाव व पतिचे नंतर नाव आहे त्यामुळे गावात घरात स्त्राrला किती सन्मान आहे हे यावरून सर्वाचे लक्षात येते
अखंड हिंदुस्थानावर आधिराज्य गाजवणार्या राजधानी सातारला जसा ज्वलंत व जीवंत इतिहास आहे अशा शुरविरांच्या जिह्यातील माणसं जशी स्वकष्टातून उभी राहिलेली असतात तशीच काही गाव आजही छत्रपतींचे प्रेरणादायी नेतृत्व मान्य करीत, त्यांच्या विचारांचा वारसा जपत व पाठिंबा देत कष्ट उपसतात आणि या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून उभं राहातं एक आदर्श गाव. अशाच कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या राजधानी सातारा जिह्यातील
जावळी खोर्यातील आदर्श घ्यावा असे विजयजी सपकाळ यांच्या प्रयत्नातुन उभ्या महाराष्ट्राने प्रेरणा घ्यावी असे चोरांबे गावं
संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतुन स्वर्गीय आर आर पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू करुन सबंध देशाला दिशा दिली. त्याच पावलावर पाऊल ठेवून चोरांबे गावातील तरुणांनी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छतेवर भर दिला. गाव लहान पण विकास कामात गतिमान आहे. या गावाने विकास कामांचा डोंगर रचत परिसरात जणु इतिहासच घडविला. स्वच्छ गाव सुंदर गाव या कल्पनेवर भर देऊन समाजात वेगळी ओळख तयार करत आहेत. सुरळीत रस्ते, स्वच्छ नाले, स्वयंरोजगार, बचतगट, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, तंटामुक्ती, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष व स्वच्छतेचे संदेश फलक, बंदिस्त गटारे, पेवर ब्लॉक, एवढच नव्हे तर गावांमध्ये आठ लाख लिटरची पाण्याची टाकी असुन गावकर्यांच्या सुरक्षिततेकरता संपूर्ण गाव ण्ण्ऊन्न् कक्षेतही आहे, जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, असे अनेक उपक्रम अगदी वाद विवाद न करता विचार विनिमयातुन राबवले जातात.
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता हातभार लावणे ही जबाबदारी समजुन
जलसंधारणाच्या कामांमध्ये वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धनही केल जाते पाणी आडवा पाणी जिरवा, ओढा रुंदीकरण व खोलीकरण, बंधारे बांधकाम, तलाव खोलीकरण व रुंदीकरण, सौर ऊर्जा चे दिवे, बायोगॅस सयंत्र, विहिरीचे पुनर्भरण, वनराई, सांडपाणी व्यवस्थापन.
या योजना लोकसहभागातून केल्या जातात. पाणी स्त्राsताचे बळकटीकरण करण्याकरीत गाव पाण्याच्या दृष्टीने स्वंयपूर्ण केले. डीप सी सी टी, अनगड बांध सी सी टी, आरोग्य शिक्षण, महिला समक्षीकरण, गावातील स्वच्छता, निर्मल शौचालय, शोष खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, दारूबंदी इत्यादी दरवर्षी विविध शिबिरांचे आयोजन, तसेच यंदा कोरोना ण्न्न्घ्अ च्या महामारी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन, असे विविध उपक्रम गावांमध्ये राबवले जातात.
कोरोना या महामारी काळात श्री विजय बापू सपकाळ यांनी गाव हे आपलं घर समजुन कर्ताव्यक्तीची जबाबदारी पार पाडत कोरोनायोद्ध्याचे रात्रंदिवस काम केलं तसेच शरीर व आरोग्यदायी विचार करता गावामधे खुली व्यायामशाळा (दजह gब्स्)ची यशस्वी सुरवात केली
दर आठवडय़ाला श्रमदान घेतले जाते यामध्ये महिला 100ज्ञ् सहभागी असतात. तसेच लोकवर्गणीतून गावामध्ये भरपूर विकास कामे झाली आहेत. गावाची सामाजिकता व गावाची एकी ही गावाची खरी ताकद आहे. या गावचे सुपुत्र जावली तालुक्याचे माजी आमदार श्री सदाभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे केली जातात
या गावांमध्ये लोकवर्गणीतून चाळीस लाखाचे श्री पद्मावती देवीचे सुंदर मंदिर गावाच्या विकासाची शान आहे. हे ग्रामदैवत साठ गावचे श्रद्धास्थान आहे. तसेच या गावाचे एक वैशिष्टय़ म्हणजे या गावात पूर्वीपासून रॉकेल जाळले जात नाही व महत्त्वाचे म्हणजे गावांमध्ये कोणाच्याही घरी गणपती न बसविता लोकमान्य टिळकांनी चालू केलेला एक गाव एक गणपती असा आदर्श उपक्रम गावामध्ये गेली चाळीस वर्षे राबविला जात आहे. चोरांबे गावामध्ये आत्तापर्यंत विविध मान्यवरांनी भेट दिले आहे. यामध्ये पद्मश्री आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार, महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय श्रीयुत गोयल सो., जलस्वराज्य प्रकल्प पाहण्यासाठी अमेरिका व अफगाणिस्तान वरून जागतिक बँकेचे प्रतिनिधी गावची पाहणी करण्यासाठी आले होते. जिल्हा परिषद सातारा माजी कार्यकारी अधिकारी व आत्ताचे पालघर डहाणू चे जिल्हाधिकारी (कलेक्टर) माननीय कैलास जी शिंदे, उपसंचालक भूजल सर्वेक्षण पुणे विभाग मिलींद देशपांडे .,, संदीप नवले इत्यादी मान्यवरांनी गावात भेट देऊन गावचे कौतुक केले आहे. गावाच्या विकासामध्ये माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, व ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तरुण मंडळ मुंबईकर, पुणेकर या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.चोरांबे गाव जिह्यात सुद्दा प्रथम क्रमांक मिळवेल असा आत्मविश्वास आम्ही जावळीकरांना आहे