वादळी पावसाने उभी पिके आडवी : भाजीपाला पिकालाही तडाखा
प्रतिनिधी /बेळगाव
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्हय़ातील बागायती पिकांना फटका बसला आहे. याबरोबरच वादळी पावसामुळे भाजीपाला पिकाचेदेखील अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्हय़ातील 321 हेक्टर क्षेत्रातील बागायतींचे नुकसान झाले आहे.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने बागायत आणि भाजीपाला पिकाला फटका बसला होता. त्यामुळे भाजीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. परिणामी दरात वाढ पाहायला मिळाली होती. त्याबरोबर आता पुन्हा दमदार पावसाने भाजीपाला पिकाची हानी झाली आहे. त्यामुळे भाजीची आवक मंदावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा वाढत्या दरांना तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हय़ात टोमॅटो, मिरची, कोबी, वांगी,
फ्लॉवर, बटाटा इत्यादीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा पूर्ण पावसाळाभर भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चढेच असलेले पाहायला मिळत आहेत. जिल्हय़ात बागायत शेतीबरोबर भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, अतिपावसामुळे भाज्या मोठय़ा प्रमाणात खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
विशेषतः वादळी पावसामुळे दोडकी, कारली, बिन्स, भेंडी आदी भाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांचे दर सर्रासपणे 60 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. बागायत खात्याकडून नुकसान झालेल्या भाजीपाला शेतीचा सर्व्हे व्हावा, अशी मागणीदेखील उत्पादक शेतकऱयांतून होत आहे. याबरोबरच कांदा पिकाचेदेखील 80 हेक्टर क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदादेखील वाढण्याची शक्मयता आहे.
विशेषतः डाळिंब, सीताफळ, चिकू, कलिंगड, पपई, पेरू, केळी आदी फळ बागायतीला फटका बसला आहे. त्यामुळे फळ बागायतदारदेखील हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त फळबागायतींचीही पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांतून होत आहे.
सर्व्हे करून पुढील कार्यवाही करणार
वादळी पावसामुळे बागायती आणि भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे. वाऱयामुळे उभी पिके आडवी झाल्याने उत्पादकांना जबर फटका बसला आहे. खात्यातर्फे सर्व्हेचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)