Deepak Kesarkar On Uddhav Thackeray Sanjay Raut : पाहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरू असताना भाविकांना दर्शन घेता आले. आतापर्यंत टिव्हिवर लाईव्ह आपण पाहत होतो. मात्र याचा अनुभव यावेळीस प्रत्यक्ष आला. पंढरपूरच्या विकासाठी मोठा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. रुक्मिनी-विठ्ठल मंदिराची अंतर्गत सजावट होण्यासाठी देखील निधी दिला आहे. ईद आणि एकादशीचा अनोखा योग आज आहे.सर्वांनाच आषाढी एकादिशी आणि ईदच्या सर्वाना शुभेच्छा पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिल्या. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, संजय राऊत कायदेमंडळाबद्दल बोलत आहेत.दुसरा कोणी बोलला असता तर तो जेलमध्ये असता. संजय राऊत कायदे मंडळात असल्याने यांना संरक्षण आहे. भारत-पाकिस्तान फाळणीसुद्धा धर्माच्या आधारे झाली. मुस्लिम स्वतंत्र देश म्हणून जाहीर झाला.भारताने हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर केले नाही. मुस्लिम गेल्यानंतर हिंदू राष्ट्र उरले होते. भारत सर्वधर्मसमभावाचा देश आहे. सर्वांना समान न्याय असला पाहिजे. संजय राऊत औटघटकेच सरकार म्हणारे कोण आहेत. संजय राऊत यांना फारसे सिरीयस घेऊ नका असेही केसरकर म्हणाले. समान कायदा झाला तर न्याय समान मिळतो.संजय राऊत यांना अधिसूचना आल्यावर ऑब्झक्शन पाठवू शकता. एखाद्या नगरपालिकेचा आणि समान नागरी कायद्याचा संबंध असू शकतो का? याचा सर्वांनी विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला.
जाहिराती संदर्भात बोलताना केसरकर म्हणाले की, लहान लहान गोष्टी काढून राजकारण करायचे हे चुकीचे. मुळात ही जाहिरात मुख्यमंत्री यांना दाखवून केलेली नव्हती. कार्यकर्त्यांकडून ही जाहिरात दिली होती. ती थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तोपर्यंत प्रिंटिंगला जाहिरात गेली होती.त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नव्हते त्यामुळे नंतर जाहिरात दुसरी दिली.
शरद पवार यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला त्याला जनतेने स्वीकारले. त्यांचा उठाव आणि आमची गद्दारी का?. आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून उठाव झाला.महाराष्ट्राच्या इतिहासत हे फक्त दोनदा घडले. पवार त्यानंतर चार वेळा मुख्यमंत्री झाले.एकनाथ शिंदे सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होतील.मुख्यमंत्री कोण होणार हे दोघांनी मिळून ठरवायचे.या आगोदर फडणवीस म्हणत होते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार म्हणत होते.काही अॅडजस्टमेंट असू शकतात.पहिला तुम्ही व्हा मी नंतर होतो असे असू शकते. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा म्हंटले होते.आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो. महाराष्ट्राला आश्वासक चेहरा लाभलेला असल्याचेही त्यांनी म्हटलय.
मोर्चाच्या परवानगीचा निर्णय पोलिसांनी घ्यायचा आहे. आम्ही त्यात इंटरफेअर करणार नाही.मोर्चा का काढताय? लोकांच्या जीवघेण्याचा अधिकार कोणी दिला? लाईफलाईनला का कंत्राट दिले? भयानक व्हिडिओ आहेत. असे अनेक सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केले.
काही लोक मुख्यमंत्री झाले म्हणून पूजा करतात पण वारीचे नियोजन करण्यासाठी विठ्ठल भक्त व्हावे लागते. शेतकरी परंपरा जपली. एवढ्या मोठ्या पक्षाची फरफट झाली. मूळ पक्ष बाजूला गेला. एवढी वर्ष नेतृत्व करणारी लोक बाजूला राहिली. याच दुःख आम्हाला वाटते. असे सल्ले घेतले की घरच्या लोकांमुळे पक्ष कसा अडचणीत येतो हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले आहे.