ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2024 ला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा उत्तम चेहरा आहे, असे विधान खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सांभाळता आलं नाही. पंतप्रधान मोदींना हरवणे हे कोणा येड्या गबाळ्याचे काम नाही, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते. ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. या बंडाला आता लोकांचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्रीपद सांभाळता आलं नाही. आता ते 2024 ला मोदी यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे विधान राऊत करतात. मोदींना हरवणे हे येड्या गबाळ्याचं काम नाही. कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळाला म्हणून मविआने हूरळून जावू नये.
अधिक वाचा : राहुल गांधींची परदेशातील मते आक्षेपार्ह नाहीत
दरम्यान, यावेळी कर्नाटक आणि राजस्थान निवडणुकीत भाजपाला यश मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.