स्थानिक आमदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये : खानापुरात पदाधिकाऱयांकडून पत्रकार परिषदेत कामाचा आढावा
वार्ताहर /खानापूर
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आज तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. पण या योजना आपणच केल्याचा आव स्थानिक आमदारांकडून केला जात आहे, हे चुकीचे आहे. तालुक्मयातील विकासकामे हाती घेण्याची स्थानिक आमदारांची नैतिक जबाबदारी असते. असे असताना एखाद्या रखडलेल्या कामासंदर्भात नाहक उठाठेव करून रस्त्याच्या बाजूला ’आम्ही काय करू’ असे हतबलतेचे बोर्ड लावणे ही त्यांच्या कामकाजाची नामुष्की म्हणावी लागेल. तालुक्मयातील विकास निधी भाजप सरकारकडूनच मिळतोय, याचे श्रेय लाटत आपणच काम केल्याचा ठाहो फोडला जात आहे. पण न झालेल्या कामासंदर्भात दुसऱयाच्या डोक्मयावर खापर फोडणे हे आमदार निंबाळकर यांचे धोरण चुकीचे आहे. जनतेची केवळ दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप खानापूर तालुका भाजपा पदाधिकाऱयांनी मंगळवारी येथील विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गात भू-संपादन झालेल्या शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रलंबित तक्रारींचे निवारण करून न्याय मंजूर करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यात केंद्र व राज्य शासनामार्फत मंजुरी होणारी कामे ही भाजपप्रणित सरकारकडून राबविली जात आहेत. दीनदयाळ उपाध्याय योजना अथवा जलमिशन योजनांतर्गत केंद्र सरकारकडून 90 टक्के निधीची तरतूद आहे. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे श्रेय लाटू नये. तालुक्यात गेल्या पाच वर्षात स्थानिक कंत्राटदारांना एकही काम मिळाले नाही. टक्केवारीच्या कचाटय़ात अनेक कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याने निधीचा दुरुपयोग झाला. झालेली विकासकामे अवघ्या एक वर्षात उद्ध्वस्त झाली आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? तालुक्यातील टक्केवारीला कंटाळून कंत्राटदारांनी कामे करणेच बंद केले आहे. त्यामुळे बाहेरचे कंत्राटदार येऊन निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी कस्तुरीरंगन अहवालाला विरोध हा होणारच. तालुक्मयातील विकासकामे आपणच जणू स्वतःच्या निधीतून केल्याचा आव आणत आहेत. मात्र, न झालेल्या कामाचा आगडोंब भाजप प्रशासनावर फोडत आहेत, हे चुकीचे आहे. स्थानिक काँग्रेस आमदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.
तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी शहरांतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे काम हे बायपास महामार्गाचे काम झाल्याबरोबर तातडीने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी निविदाही लवकरच काढण्यात येणार आहे. भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांनीही तालुक्मयात राजकारण डोळय़ासमोर ठेवून स्कूल बॅग वाटप करण्यापेक्षा पडझड होत असलेल्या शाळांच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी आमदार निंबाळकर यांना दिला.
पत्रकार परिषदेला जि. पं. माजी सदस्य ज्योती बांदे माने, राज्य वन विकास निगमचे संचालक सुरेश देसाई, भाजपा प्रवक्ते राजेंद्र रायका, सेपेटरी गुंडू तोपिनकट्टी, युवा नेते पंडित ओगले, ता. पं. माजी सदस्या वासंती बडगेरसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
कस्तुरीरंगन अहवाल म्हणजे गावे उठविण्याचा डाव
कस्तुरीरंगन अहवालानुसार गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत पश्चिम घाटाच्या सानिध्यात येणाऱया अनेक गावांना इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करून या प्रदेशात येणाऱया अनेक गावांवर टांगती तलवार आणली आहे. खानापूर तालुक्मयातील 65 गावे यात समाविष्ट केली आहेत. या गावांमध्ये कोणतीही योजना राबवताना परवाना आवश्यक आहे. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी गावनिहाय बैठका घेऊन विरोध दर्शविण्यात येणार असल्याची माहिती जि. पं. चे माजी सदस्य बाबुराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.