प्रतिनिधी /खानापूर
औद्योगिक अपघात, वाहनांचे अपघात, युद्ध इत्यादी कारणांनी नैसर्गिक अवयव गमविणाऱया व्यक्तींना कृत्रिम अवयवांची गरज भासते. तसेच कर्करोग, संसर्ग आणि अभिसरण रोग इत्यादीमुळे नैसर्गिक अवयव गमवावे लागतात. तेव्हा अशी गरज निर्माण होते, असे विचार खानापूरचे नगराध्यक्ष मजहर खानापुरी यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून हल्याळ येथील व्ही. आर. देशपांडे मेमोरियल ट्रस्ट, कॅनरा बँक, देशपांडे आर. सेट संस्था हल्याळ, लायन्स क्लब खानापूर, ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन आणि महावीर लिंब, हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर व कित्तूर तालुक्मयातील गरजू अपंगांना मोफत कृत्रीम अवयव वाटप शिबिराचे आयोजन खानापूर नगर पंचायतीच्या रेल्वे स्टेशन रोडवरील सभागृहामध्ये करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी देशपांडे आर. सेट संस्थेचे योजना संयोजक विनायक चव्हाण होते. यावेळी खानापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष मल्लेशी बेनकट्टी, नगरपंचायतीचे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, एम. एस. नायकर, हुबळी महावीर लिंबचे वरि÷ तंत्रज्ञ सुदर्शन, समाजसेवक निरूपती कांबळे व महिला व बाल विकास खात्याच्या प्रतिनिधी समीना खानापुरी, रमेश पाटील, जोतिबा पाटील व ईश्वर गुरव आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये खानापूर व कित्तूर तालुक्मयामधून आलेल्या दिव्यांगांना 45 कृत्रिम पायांचे व हातांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे योजनाधिकारी संतोष परीट यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संतोष सिद्धेनकोप्प यांनी आभार मानले.