Forest rights conference concluded today in Sawantwadi!
सावंतवाडी / प्रतिनिधी
पिढ्यानंपिढ्या जंगलात राहणाऱ्या, जंगल जमिनीवर घरे बांधलेल्या, जंगल जमिनी कसून उदरनिर्वाह करणाऱ्या, जंगलावर ज्यांचं जगणं अवलंबून आहे अशा बेरड, धनगर, ठाकर, कातकरी आणी कुणबी कुटुंबांची वन हक्क परिषद सावंतवाडीत आज झाली. या वन परिषदेमध्ये आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वन हक्क दावे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अगोदर शासनाने वन हक्क संदर्भात कार्यशाळा घ्यावी असाही निर्णय घेण्यात आला. गावागावात अध्यापही वन हक्क समित्या गठीत झाल्या नाहीत. त्या तात्काळ समित्या गठीत करा आणि आम्हाला एकदा न्याय द्या असा महत्त्वकांक्षी ठराव आजच्या वन हक्क परिषदेत घेण्यात आला . सावंतवाडी नवसरणी येथे घेण्यात आलेल्या वनहक्क परिषदे. श्रमिक संघटनेचे नेते संपत देसाई, अंकुश कदम, निमंत्रक राजेंद्र कांबळे उपस्थित होते यावेळी चौकुळ बेरडकी अस न ये तुळस सरमळे नांगरतास आंबोली आधी गावातील ग्रामस्थ या परिषदेत उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्यथा आणि कथा या परिषदेत व्यक्त केल्या ते म्हणाले आम्हाला पाणी नाही आम्हाला घरे नाहीत आम्हाला कुठलाच हक्क नाही आम्ही कसेबसे जगत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.