मान्सूनची फाईल केरळ राज्यापर्यंत आली आणि खोळंबली. आता ती कर्नाटक राज्यावर आहे. ही फाईल महाराष्ट्रात येण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग काहीच करत नाही. असे सरकारी कार्यवाही होत नसल्याप्रमाणे †िस्टरीओटाईप आरोप करणे हास्यास्पद आहे. गेल्या दिडशे वर्षापासून पाऊसमान अंदाजित करणारे भारतीय हवामानशास्त्र विभाग जुने आणि विश्वासार्ह विभाग आहे. राज्यातील अनेक स्वयंघोषित तज्ञांनी पावसाबद्दल चुकीच्या निवेदनांवर कृपया विश्वास न ठेवता हवामानशास्त्र विभागाने दिलेली माहितीच पहावी असे रविवारी वैतागून सुचना देणे भाग पडावे लागले हेच दुर्दैवी…
बंगालच्या खाडीपासून मान्सूनच्या प्रगतीला सुरुवात झाल्यापासून त्याच्या अंदमानात, केरळात, महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अंदाजित तारखा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आल्या. तसा मान्सून टप्प्याटप्प्याने दाखल होत गेला. यात केरळात रेंगाळल्याचे सांगत अंदाज चुकला असा आरोप करण्यात आला. मात्र हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजात ऋण-अधिक चार ते पाच दिवस असे नेहमीच सांगण्यात येत होते. याकडे आरोप करणाऱयांचा दुर्लक्ष होत होता. शिवाय प्रत्येक अंदाजासोबत ‘हवामान स्थिती पुरक राहिल्यास’ असे सांगून पुढील अंदाज वर्तविण्यात येत असे. ही पुरक हवामान स्थितीच स्वयंघोषित हवामानतज्ञ किंवा खासगी तज्ञ ध्यानात घेत नसल्याचे अशा ठिकाणी दिसून येते. तसे पाहिल्यास भारतीय हवामानशास्त्र विभाग गेली दिडशे वर्ष मान्सून अंदाज सादर करत आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित असलेली मान्सून निरीक्षणकेंद्र आता वाढली आहेत. त्यामुळे विभागाची अंदाजातील अचुकता वाढत राहिली. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा मान्सून बाबतचा अंदाज 85 टक्के अचूक येत असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञदेखील कबुली देत आहेत. शिवाय खासगी तज्ञ देखील याच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपग्रहांचे निरीक्षण नोंदीकरूनच अंदाज वर्तवित असतात.
यंदाचा मान्सून दाखल होण्याचा अंदाज निरीक्षण आणि अभ्यासावर आयएमडीने वर्तविला आहे. या काळात बंगालच्या सागरात असनी चक्रीवादळही येऊन गेले. तत्कालीन वातावरणातील बदलातून मान्सून अंदाजदेखील बदलते राहिले. मान्सूनचे रेंगाळणे टप्प्याटप्प्याने दाखल होणे हे अंदाज आयएमडीकडून देण्यात आले. आता केरळातून महाराष्ट्राकडे कूच करणारा मान्सून उशीर करतोय असे काहींना वाटू लागले. मात्र आयएमडीने राज्यात मान्सून 7 जून रोजी तर मुंबईत 11 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र तसे होत नसल्याचे दिसू लागल्यावर अंदाज चुकतायत असे आरोप होऊ लागले. दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचे ढग राज्यावर दिसून येत आहेत. हे काहीजणांकडून दुर्लक्षित होत आहेत.
अलीकडे हवामान शास्त्राच्या मान्सून अंदाजाची तुलना एखाद्या सरकारी कार्यवाही सोबत केली जात असल्याप्रमाणे वाटते. मान्सूनची फाईल केरळ राज्यापर्यंत आली आणि खोळंबली. आता ती कर्नाटक राज्यावर आहे. ही फाईल महाराष्ट्रात येण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग काहीच करत नाही. असे सरकारी कार्यवाही होत नसल्याप्रमाणे ‘†िस्टरीओटाईप’ आरोप करणे हास्यास्पद आहे. यांची तेंडे बंद करण्यासाठी की काय, ‘राज्यातील अनेक स्वयंघोषित तज्ञांनी पावसाबद्दल चुकीच्या निवेदनांवर कृपया विश्वास न ठेवता हवामान शास्त्र विभागाने दिलेली माहितीच पहावी’ असे रविवारी वैतागून सूचना देणे भाग पडावे लागले. या विभागाच्या मान्सून अंदाजात अचूकता असते हे गेल्या काही वर्षांतील मान्सूनचा डाटा सांगून सप्रमाण सांगता येऊ शकते. ढगांनी अच्छादलेले उपग्रहांचे फोटो दिसणे म्हणजे मान्सून अंदाज करणे असे नव्हे. मान्सून ठराविक ठिकाणापर्यंत येऊन पुढे सरकण्यासाठी पुन्हा काही वातावरणीय पुरकतेचे निकष अंदाज करण्यात मोजावे लागतात. तरी बरे अंदाज करताना हवामान विभागाकडून वारंवार तसे स्पष्ट केले जात आहे.
दरम्यान राज्यात मान्सून दाखल होण्यास 7 जून तर मुंबईत मान्सून 11 जून तारीख वर्तविण्यात आली आहे. यात उणे-अधिक तीन ते चार दिवस असू शकतात. रविवारच्या उपग्रहाच्या छायाचित्राप्रमाणे अद्याप मान्सूनचे ढग कर्नाटकात कारवारवरच रेंगाळत आहेत. ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्यास वातावरणीय स्थिती पुरक नाही. आज सोमवारी रात्रीपासून किंचित पुरक स्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे आयएमडी शास्त्रज्ञ सांगतात. ही प्रक्रिया मंद गतीने सुरु असून अशी स्थिती निर्माण होत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र मान्सून किंचित उशिरा आला तरीही एकंदरीत पाऊसमानावर किंचितही दुष्परिणाम होणार नसल्याचे शास्त्रज्ञ मत मांडत आहेत. मान्सून केरळातून पुढे सरकत कर्नाटक- कारवारमध्ये 31 मे रोजी दाखल झाला होता. 31 मे ते 6 जून पर्यंत तो तिथेच आहे. बंगळुरु धर्मपुरी आदि भाग धरता मान्सूनचे स्थान 15 डिग्री लॅटीटय़ुडवर आहे. त्याला पुढे सरकण्यास वातावरणीय अडथळे पार करावे लागणार आहेत. महाराष्ट्रातील काही भागात अद्याप उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भात अद्याप उष्णतेची सुरु आहे. तसेच वाऱयाची गती पोषक नाही. अजूनही उत्तर-पश्चिम वारा वाहत असून मान्सूनसाठी पुरक असणाऱया नैऋत्य मोसमी वाऱयाला अद्यापही गती नाही. नैऋत्य मोसमी वारा वाहू लागला असल्यास मान्सूनसाठी पुरक स्थिती निर्माण होते. अरबी मान्सून वारे कमजोर आहे. तरी देखील राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरी दिसून येत आहेत. सोमवारपर्यंत गेल्या 24 तासात बारामती, माळेगाव, पनदरे, वडगाव, लोणी सुपा मोरगाव सारख्या भागात जोरदार पाऊस झाल्याची नोंद आहे. असे असताना प्रत्यक्ष मान्सून हा कर्नाटक, गोवा मार्गे द†िक्षण कोकणात दाखल झाल्यानंतर किनारपट्टीवरील मान्सून प्रवेश शिक्कामोर्तब होईल. हवामान शास्त्र विभाग शास्त्रज्ञांचे मान्सूनचे निरीक्षण सुरु असून सध्या स्थिती बदलत असल्याची निरिक्षणे मांडण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी 48 ते 72 तासात मान्सून पुरक स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे मान्सून प्रवेशाची आशा पल्लवीत झाली आहे.
राम खांदारे