शासनाचे दुर्लक्ष, उत्पादक संकटात, सूर्यफूल उत्पादकांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राबविलेल्या ठिबक सिंचन योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे उत्पादकांना अनुदानापासून वंचित रहावे लागले आहे. परिणामी वाढत्या उन्हामुळे दुष्काळी भागात पिके सुकून जाण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
उन्हाळय़ाच्या दिवसांत पाण्याची बचत व्हावी आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता ठिबक सिंचन योजना राबविली गेली आहे. या योजनेंतर्गत शासन ठिबक सिंचनसाठी अनुदान मिळणार होते. मात्र मागील दोन वर्षात कोरोनापासून ही योजना रखडली आहे. शिवाय भर उन्हाळय़ात या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
जिल्हय़ात जांभूळ, पेरू, केळी, दाक्षे, काजू, आंबा, चिंच यासह गुलाब, मोगरा, सूर्यफूल आदी उत्पादकांची संख्याही वाढली आहे. अशांना ठिबक सिंचन योजना फायदेशीर आहे. मात्र यासाठी अनुदान उपलब्ध झाले नसल्याने शेतकऱयांना अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उन्हाळी पिके धोक्मयात आली आहेत.
अलिकडे बागायत क्षेत्रात वाढ झाली असून जिल्हय़ात तब्बल दोन लाखांहून अधिक जण बागायत शेती करतात. साहजिकच उत्पादनातही वाढ झाली आहे. पाण्याचा योग्य वापर आणि पिकांची योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी ठिबक सिंचन महत्त्वाची आहे. अनुसूचित जाती जमातीतील अल्पभूधारक शेतकऱयांना 90 टक्के तर इतर शेतकऱयांना 75 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप अनुदान मंजूर झाले नाही. त्यामुळे शेतकऱयांची नजर अनुदानाकडे लागून राहिली आहे.
उन्हाळय़ाच्या दिवसात ठिबक सिंचनचा अधिक वापर होतो. या परिस्थितीत उपयुक्त ठरणारी ठिबक सिंचन रखडली आहे. विशेषतः बागायत शेतकऱयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. सरकारकडे अनुदान देण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ठिबक सिंचनच्या अनुदानात वाढ करण्यात आली होती. अर्थसंकल्प जाहीर होऊन महिना उलटला तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे जिल्हय़ातील हजारो बागायत उत्पादक ठिबक सिंचन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
ठिबक सिंचन पद्धतीमुळे 50 टक्के पाण्याची बचत होवून पाणी थेट वृक्षांच्या मुळांपर्यंत पोहोचते. त्यामुळे झाडांची जोमाने वाढ होवून उत्पादनही वाढते. कमी पाण्यात अधिक लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन महत्त्वाची ठरते. यामुळे अलिकडे ठिबक सिंचनद्वारे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे.
अनुदान लवकरच उपलब्ध
शासनाकडून ठिबक सिंचनसाठी सध्या अनुदान थांबले आहे. मात्र येत्या काळात अनुदान उपलब्ध होणार आहे. ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत होते. शिवाय झाडाच्या मुळापर्यंत पाणी, औषध व इतर गोष्टी सुरळीत पोहोचतात.
-महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)