राधानगरी/ महेश तिरवडे
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे 3 टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे, या वर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती, मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे,
आज दिवसभरात 88 मीमी इतका पाऊस नोंदला आहे ,तर आजतागायत 780 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे,गेल्या वर्षी 8 जुलै 2022 साली 901 मीमी पाऊस नोंदवला होता, सध्या खाजगी जलविद्युत केंद्रातुन 700 क्यूसेकने विसर्ग सुरू केल्याने भोगावती नदी पात्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, असाच पावसाचा जोर राहिल्यास जुलै अखेरीस राधानगरी धरण भरण्याची शक्यता आहे