सावंतवाडी / प्रतिनिधी
तेरेखोल नदी पात्रात गाळाच्या नावावर अवैद्य वाळू उत्खनन करून बेकायदेशीर वाहतूक होत आहे. याबाबत महसूल खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने शासकीय यंत्रणेला जाग आणण्यासाठी सुमेध गावडे यांनी मंगळवारपासून सावंतवाडी तहसिल कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे.गाळ उपसाच्या नावाखाली तेरेखोल नदी पात्रातील ओटवणे, इन्सुली, सातुळी, दाणोली भागात अवैद्य वाळू उत्खनन सुरू असून त्याची वाहतूक होत असल्याची सुमेध गावडे यांची तक्रार आहे.