प्रतिनिधी / सातारा :
मी मंत्री आहे. तोपर्यंत मला जिह्यात बेशिस्तपणा चालणार नाही. मला शिस्तबद्द काम हवे आहे. कोणी समजत असेल मंत्र्याला काम नाही, म्हणून बैठक घ्यायला आला आहे. तर तो गैरसमज काढून टाका. जो अधिकारी काम करताना दिसणार नाही. त्याच्यावर ऑन दि स्पॉट कारवाई केली जाईल. कोणी टंगळमंगळ करायला आले असेल तर ते मी खपवून घेणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. गतीमान सरकार आहे. लोकांची जनतेची कामे करणारे आहे, अशा शब्दात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत अधिकाऱयांना फैलावर घेतले. दरम्यान, राज्य शासनाचा कृषी विभाग रडारवर होता.
पडलेल्या पावसाच्या अनुषंगाने मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच मंत्री शंभूराज देसाई यांनी सक्त सुचना देताना म्हणाले, मला शिस्तबद्द काम पाहिजे. जोपर्यंत मी मंत्री आहे. तोपर्यंत माझ्याकडे जिह्याचे काम आहे. तोपर्यंत चांगले काम हवे आहे. मला शिस्त हवी आहे. मला टंगळमंगळ, कामात हयगय करणारे अधिकारी चालणार नाही. कामचुकारपणा करताना आढळून आले तर ऑन स्पॉट त्या अधिकाऱयावर कारवाई केली जाईल. पहिली बैठक आहे, म्हणून समजून घ्या, कारवाई झाल्यावर पुन्हा कुरबुर करु नका, अशा सुचना देत त्यांनी कृषी विभागाचे अधीक्षकांना पाऊस कुठे झाला?, किती मिलिमीटर झाला, नुकसान कोठे झाले? याचा आढावा विचारला. त्यावर त्यांनी सातारा जिह्यातील फलटण, खंडाळा, वाई, कराड या तालुक्मयात पाऊस झाल्याचे सांगितले. त्यावर मंत्री देसाई यांनी शासनाचा जीआर आल्याचे माहिती आहे का?, त्यावर ते थोडेस चपापले. त्यावरुन देसाई यांनी नुकसानीचे पंचनामे तात्काळ जाग्यावर जावून करा. शेतकऱयांना भरपाई मिळाली पाहिजे, अशा सुचना दिल्या.
अधिक वाचा : पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन
बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडून आढावा घेत असताना त्यांच्याकडून कालच्या पावसात कोठे कोठे साकव पुलांना हानी पोहचली त्याची माहिती घ्या. जाग्यावर जावून पाहणी करुन दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठवून द्या, अशा सुचना केल्या.
कासवर धावणार इलेक्ट्रीक बस
कास पुष्प पठारावर इलेक्ट्रीकल बसेस धावणार आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या बसेसच्या प्रशासनाशी चर्चा झाली आहे. एमआयडीसी आणि शिवाजी संग्रहालय येथे चार्जिंग पॉईंट उभे करण्यात येणार आहे. एका आठवडय़ात या कामाची कार्यवाही होणार आहे, असेही मंत्री देसाई यांच्यापुढे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशीं यांनी ग्वाही दिली.