आमदार शशिकांत शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप करण्याच्या वेळी काँग्रेसकडून देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायचे चालले आहे. तसे झाले तर देशात आणि राज्यात परिवर्तन अटळ आहे. भाजपाची सत्ता घालवण्याचा एकमेव मार्ग आहे. मतांची जी विभागणी होते ती टाळण्यासाठी हा उपाय आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे वलय आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, जिह्यात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीला बळ येईल, असे स्पष्ट करत, खेड ग्रामपंचायतीप्रकरणी त्यांनी सध्या सुडाचे राजकारण सुऊ असल्याचे स्पष्ट केले.
जनता दरबारानंतर आमदार शशिकांत शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी दर महिन्याला जनता दरबार घेत असतो. अधिवेशनामुळे जनता दरबार लांबला होता. जनता दरबाराचा उपक्रम मी राबवलेला आहे. लोकप्रतिनिधी कोणीही असो राजकीय टिप्पणी होत असते. परंतु सध्याचे देशाचे, राज्याचे आणि तालुक्याचे आपण राजकारण बघतो. आताचे राजकारण सुडाचे राजकारण आहे. एखाद्याला त्रास देणे, एखाद्याला त्रास देऊन आपल्या पक्षात कशा पद्धतीने घेण्याची परंपरा सुऊ आहे. काही चुकीच्या पद्धती सुऊ झालेल्या आहेत. अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. कालचीच घटना पहा. त्या अगोदर कोरेगावात सुद्धा घडली. शासकीय अधिकारी सार्वजनिक कार्यक्रमाला जावू शकतात. परंतु सर्वच शासकीय अधिकारी एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या खाजगी कार्यक्रमाला जात असतील तर मग हे सरकार कसे चालले याची प्रचिती येते, असे सांगत आमदार शशिकांत शिंदे हे म्हणाले, दुसरी गोष्ट अशी आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी चौकशी मागणी केली होती. मेडिकल कॉलेजबाबतीत चारही विभाग प्रमुख म्हणतात की आम्ही परवानगी दिली नाही. मग त्याचे मालक नक्की कोण आहे. याची तक्रार कोणी करायची. आजही दुर्दैवाने तक्रार केली जात नाही. हेच मोठे दुर्दैव आहे. आम्ही विधी मंडळात विषय मांडला. भंगार चोरी करणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे. कोणीतरी तक्रार करायला पाहिजे होती. यास तीन महिने होऊन गेले. अद्यापही कोणी तक्रार केलेली नाही. जिल्हाधिकारी प्रमुख असतात. त्यांनी आपल्या अधिकारात पोलिसांना सूचना देऊन कारवाई करावी. त्यांनी कारवाई केली नाही. आम्ही संबंधितांना कोर्टात जावून नोटीसा देणार आहोत. शेवटी प्रजेचे रक्षण करण्यासाठी प्रजेलाच उभे रहावे लागते आहे, अशी परिस्थिती निर्माण होते. यांच्यावर कोणाचा दबाव आहे मला माहिती नाही. कारवाई करण्याची प्रक्रिया विधान मंडळात सर्व मंत्र्यांनी दिली. पालकमत्र्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याचे सांगितले परंतु अजून तक्रार दाखल झालेली नाही. यामध्ये अधिकारी सामील आहेत का हे तपासावे लागेल. आम्ही लढाई काय सोडणार नाही. शेवटपर्यंत नेणार आहोत, असे स्पष्ट केले.
आमदार शिंदे म्हणाले, खेडमध्ये एखाद्याला एनओसी द्यायची झाली की आम्हाला विचारल्याशिवाय द्यायची नाही असे सुऊ झाले आहे. तशा सूचना दिलेल्या आहेत. सामाजिक काम करताना लोकशाहीला हे घातक आहे. जोपर्यंत नाकापर्यत पाणी येत नाही तोपर्यंत सहन करायचे. नाकापर्यंत पाणी येईल की तेव्हा रस्त्यावर उतऊ प्रशासनाला जागा दाखवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे कऊ, असा इशारा दिला.
प्रकाश आंबेडकर यांचेही मोठे वलय आहे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक केल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनाही एक वेगळे वलय आहे. गावापासून शहरापर्यंत, जिह्याच्या ठिकाणी त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. काही जिह्यात त्यांची सत्ता आहे. माझा असा विचार आहे की येऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू शकू. म्हणजे मतांची विभागणी होणार नाही. भाजपा जर केंद्रातून त्यांना मदत करत असेल तर आम्ही महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे निर्णय घेणे आमच्यासाठी हिताचे ठरेल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी एमएसईबी प्रकरणी अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले