शासनाकडून अनुदान उपलब्ध : शेतकरी उदासीन : धोका टाळण्यासाठी संरक्षक जाळी आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
शिवारात मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेतून शेततळय़ांची निर्मिती केली गेली आहे. दरम्यान, या शेततळय़ांच्या संरक्षक कुंपणासाठी कृषी खात्याकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, शेतकऱयांमध्ये जागृतीचा अभाव असल्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱयांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
जिल्हय़ात 2 लाख 89 हजार 827 शेततळय़ांची निर्मिती केली गेली आहे. काही शेतकऱयांनी स्वखर्चातून शेततलावांची खोदाई केली आहे. त्यामुळे अलीकडे शेततळय़ांची संख्या वाढली आहे. दरम्यान, कोणतीही हानी होऊ नये, शेततळय़ातील पाणी सुरक्षित राहावे, यासाठी शासनाकडून संरक्षक कुंपणासाठी अनुदान दिले जात आहे. मात्र, शेतकरीच या अनुदानासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे.
रोजगार हमी योजना ग्रामीण भागात सक्षमपणे राबविली जात आहे. डोंगराळ क्षेत्राबरोबर शिवारातही ठिकठिकाणी शेततळय़ांची निर्मिती केली आहे. मात्र, अनेक शेततळय़ांच्या भोवती संरक्षक जाळय़ा नसल्याने धोका निर्माण झाला आहे. शेततळय़ांच्या संरक्षक जाळीसाठी खात्याकडून अनुदान उपलब्ध होत असले तरी शेतकऱयांच्या दुर्लक्षामुळे अनुदान वाया जात आहे. शिवारात खोदलेल्या तलावांना संरक्षक जाळी नसल्याने लहान मुले, पाळीव जनावरे आणि वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी शाळकरी मुले तलावात बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याकरिता शासनाने शेततळय़ांच्या कुंपण जाळीसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध केले आहे.
शेततळय़ांच्या शेजारी सूचना फलक बसविण्याचे आदेश कृषी खात्याने दिले आहेत. मात्र, अद्यापही बऱयाच शेततळय़ांच्या शेजारी सूचना फलक दिसून येत नाहीत. दरम्यान, रोजगार हमीतून खोदलेल्या तलावांची खोली अधिक आहे. शिवाय मागील दोन वर्षात झालेल्या अतिपावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यंदा उन्हाळय़ात झालेल्या पावसामुळे मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱयांनी अनुदानाचा वापर करून शेततलावांना संरक्षक जाळी बसविण्याचे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हय़ात शेततलावांच्या संख्येत वाढ
शेततळय़ांच्या सभोवती संरक्षक जाळी बसविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, शेतकऱयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. धोका टाळण्यासाठी शेततलावाची निर्मिती केलेल्या शेतकऱयांनी संरक्षक जाळी बसवून घ्यावी. जिल्हय़ात शेततलावांची संख्या वाढली आहे. धोका टाळण्यासाठी शेतकऱयांनी संरक्षक कुंपण घालणे आवश्यक आहे.
– एच. डी. कोळेकर, उपनिर्देशक, कृषी खाते