नवी दिल्ली :
मागच्या मे महिन्यामध्ये भारताने 10 हजार कोटी रुपयाहून अधिक किंमतीच्या आयफोनची निर्यात करण्यामध्ये यश मिळविले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये (एप्रिल-मे) आयफोनची निर्यात ही 20 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची झाली आहे.
मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 9,066 कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात भारतातून केली गेली होती. यामध्ये अॅपलची भूमीकाही अत्यंत महत्त्वाची ठरली. भारतामध्ये आगामी काळात अॅपल कंपनीला अधिकाधिक विस्तार करावयाचा आहे. त्या दृष्टीने कंपनीची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. भारतातून स्मार्टफोनची निर्यातही यंदा विक्रमी स्तरावर झाली आहे. यामध्ये 80 टक्के वाटा हा आयफोनचा असल्याचे सांगितले जाते. दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीचा वाटाही वाढला आहे. अॅपल कंपनीने चीननंतर आता भारतावरच आपले लक्ष्य व्यवसाय विस्तारासाठी केंद्रीत केले आहे. भारतात स्मार्टफोन निर्मितीला पीएलआय प्रोत्साहन योजनेचा मोठा हातभार लाभला आहे.