वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय महिला राष्ट्रीय निवड समितीने एसीसी इमर्जिंग महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुक्रवारी भारत अ इमर्जिंग महिला संघाची घोषणा केली. श्वेता सेहरावतकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
12 जूनपासून ही स्पर्धा हाँगकाँगमध्ये सुरू होत असून 21 जून रोजी त्याची अंतिम लढत होणार आहे. एकूण आठ संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. इंडिया अ हा गट अ चा भाग असून याच गटात हाँगकाँग, थायलंड अ व पाकिस्तान अ यांचाही समावेश आहे. बांगलादेश अ, लंका अ, मलेशिया व संयुक्त अरब अमिरात यांचा ब गटात समावेश आहे. भारताची सलामीची लढत 13 जून रोजी हाँगकाँगविरुद्ध, 15 जून रोजी थायलंडविरुद्ध आणि 17 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध लढत होणार आहे.
भारत अ इमर्जिंग महिला संघ : श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी (उपकर्णधार), त्रिशा घोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, उमा चेत्री, ममता मडिवाला, तितास साधू, यशश्री एस. काश्वी गौतम, पार्शवी, चोप्रा, मन्नत कश्यप, बी.अनुशा