सहावी विधानसभा 1978 : आणीबाणीनंतरच्या जनता लाटेतही चमत्कार
24 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. देवराज अर्स यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 149 जागांवर विजयी होत बहुमत मिळविले होते. तर विरोधी पक्ष असलेल्या जनता पक्षाला 59 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 214 जागा लढविल्या होत्या. तर जनता पक्षाने 222 मतदारसंघात आपले उमेदवार दिले होते. काँग्रेसला निवडणुकीत 44.25 टक्के मते मिळाली. याचबरोबर 480 अपक्ष उमेदवारांनी ही निवडणूक लढविली होती. यात केवळ 10 अपक्ष उमेदवारांचा विजय झाला होता. तसेच पाच मतदारसंघांमध्ये म. ए. समितीचे उमेदवार निवडून आले होते.
या निवडणुकीत संघटना काँग्रेसने सुमारे 212 जागा लढविल्या होत्या. परंतु, केवळ दोनच उमेदवार विजयी झाल्याने पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. केवळ 8 टक्के मते या पक्षाला मिळाली होती. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले होते. तब्बल 1,165 जणांनी ही विधानसभा निवडणूक लढविली होती. अन्य पक्षांनी 28 जागा लढविल्या होत्या. परंतु त्यांना आपले खातेही उघडता आले नव्हते. यावेळी 1 कोटी 25 लाख 28 हजार 663 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
शेतकरी नवरा करा अन् घसघशीत 2 लाख मिळवा!
निजद नेते कुमारस्वामी यांची घोषणा
विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला शुभारंभ झाला असून विविध आश्वासनांचा पाऊस पाडण्यात विविध नेते रममाण झाल्याचे पहायला मिळत आहे. निजदचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीदेखील असेच एक अजब आवाहन केल्याचे पहायला मिळत आहे. कोलार जिल्ह्यात एका रॅलीमध्ये त्यांनी तरुणींना शेतकऱ्याशी विवाह केल्यास 2 लाख रुपये दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. तशी एक योजना जारी करणार असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
हल्ली तरुणी शेतकऱ्यांशी लग्न करण्यासाठी इच्छुक नसल्याची खंत कुमारस्वामी यांनी व्यक्त केली. एकंदर परिस्थिती पाहून त्यांनी यांनी ऐन निवडणुकीच्या फडामध्ये अशा प्रकारची घोषणा करून मतदारसंघातील तरुणींना आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळत आहे. कुमारस्वामी यांनी निजद सत्तेवर आल्यास आर्थिक मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्याशी लग्न केलेल्या तरुणीला 2 लाख रुपये देण्याची योजना जारी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. आता या घोषणेनंतर किती तऊणी निजदच्या पारड्यात आपले मत घालतात, हे पाहावे लागेल.
आता स्टार प्रचारकांचा धडाका
पंतप्रधान मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्व शर्मा होणार सहभागी
भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपली 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 52 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आता पुढील काळामध्ये पक्षाच्या प्रचारावर अधिक भर दिला जाणार असून भाजपतर्फे स्टार प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कर्नाटकात लिंगायत आणि वक्कलिग समाजाच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लिंगायत समाजाचे मतदार सर्व राज्यभर पसरलेले असले तरी वक्कलिग समाजाचे मतदार मात्र म्हैसूर आणि जवळपासच्या चार जिल्ह्यांमध्येच पसरलेले आहेत. राज्यातील सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रचारावर भर देण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून याकरिताच वरील प्रचारकांना आणण्याचे नियोजन केले जात आहे.
मोदी, शहा यांचाही दौरा
योगी, शर्मा व फडणवीस यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेही राज्याच्या दौऱ्यावर येणार असून प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस कर्नाटकात स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका लागणार आहे.
वडिलांना निजदकडून तिकीट तर मुलगा काँग्रेसचा उमेदवार
राजकारणात पिता-पुत्र एकाच पक्षात दिसणे, एकाच निवडणुकीत दोघेही एकाच पक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे प्रकार सर्रास घडतात. मात्र, पिता-पुत्र एकाच निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवित असल्याचे विशेष आहे. अशा पद्धतीचा आश्चर्यकारक आखाडा सज्ज झाला आहे.
हासन जिल्ह्याच्या अरकलगुड विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री ए. मंजू निजदकडून रिंगणात उतरले आहेत. तर त्यांचे पुत्र डॉ. मंथरगौडा यांना कोडगू जिल्ह्याच्या मडिकेरी मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेला पुत्र आता स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. विशेष म्हणजे वडिलांचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास पुत्र सज्ज झाला आहे. अलीकडेच ए. मंजू यांनी काँग्रेसला रामराम ठोकून निजदमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, पुत्र डॉ. मंथरगौडा यांनी काँग्रेसचे तिकीट मिळविले आहे.
आचारसंहिता जारी झाल्यापासून हजारहून अधिक एफआयआर
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने 29 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, मद्य, ड्रग्ज, दागिने आणि भेटवस्तू जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी राज्यात 1,000 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
29 मार्चपासून आतापर्यंत एकूण 126.14 कोटी ऊपयांहून मुद्देमाल व पैसे जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्यांमध्ये रोख 47 कोटी ऊपये, 29 कोटी ऊपये किमतीचे मद्य, 20 कोटी ऊपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने, 17 कोटीचे भेटवस्तू आणि अमली पदार्थांचा समावेश आहे, असे कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये 1,042 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात अवघ्या 10 दिवसांत 36.8 कोटी ऊपये रोख, 15.46 कोटी ऊपयांच्या भेटवस्तू, 30 कोटी रुपयांचे मद्य, 5.2 लाख लिटर मद्य, 15 कोटी ऊपयांचे सोने आणि 2.5 कोटी ऊपयांचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रविवारी राज्यात रोख रकमेसह निवडणुकीशी संबंधित जप्तीचा आकडा 100 कोटींच्या जवळपास पोहोचला.
कर्नाटक राज्य रयत संघ शेतकऱ्यांना देणार तिकीट
कर्नाटक राज्य रयत संघ यंदाच्या निवडणुकीत भाग घेणार असून आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरविली असून या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला तिकीट देण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे.
संघाचे नेते प्रकाश नाईक यांनी सदरची घोषणा केली आहे. ही घोषणा करतानाच त्यांनी काँग्रेस, निजद व भाजप यांनाही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना तिकीट देण्याचे आवाहन केले आहे. अशाप्रकारे उमेदवार उभा करताना तो निवडून येईल, याची शाश्वतीही ठेवली जाणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे. आजच्या काळात शेतकरी हा विविध समस्यांनी आणि संकटांनी ग्रस्त आहे. त्याच्याकडे पहायला कुणाकडेच वेळ नाही आहे. नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून हे पाहता शेतकऱ्यांनाच उमेदवारी देऊन यांच्यामार्फत प्रश्न अधिक गांभीर्याने मांडण्याची संधी दिली जायला हवी, असे मतही प्रकाश नाईक यांनी नोंदविले आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत आठ महिलांना संधी
गेल्या काही दिवसांपासून सलग बैठका घेणाऱ्या भाजपने अखेर मंगळवारी रात्री 189 मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी विशेष म्हणजे 52 नवीन चेहऱ्यांना तिकीट जाहीर केले आहे. पहिल्या यादीत 8 महिलांसाठी तिकीट जाहीर करण्यात आले आहे. विशेषत: सुळ्या आणि पुत्तूरमध्ये विद्यमान आमदारांऐवजी महिलांसाठी तिकिटे जाहीर करण्यात आली आहेत.
क्र् निपाणी- शशिकला जोल्ले
क्र् सौंदत्ती यल्लम्मा- रत्ना विश्वनाथ मामनी
क्र् कारवार- रुपाली संतोष नाईक
क्र् संडूर- शिल्पा राघवेंद्र
क्र् नागमंगल- सुधा शिवरामेगौडा
क्र् पुत्तूर- आशा तिम्मप्पा
क्र् हिरियुर- पुर्णिमा श्रीनिवास
क्र् सुळ्या- भगिरथी मरुळ्या
परिवहन खात्यालाही आयोगाने जुंपले!
10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, परिवहन खाते तिकिटावर ‘न चुकता मतदान करा’ असे छापून मतदानाचे महत्त्व वाढवत आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळीही राज्य परिवहन महामंडळाकडून मतदारांना तिकीटाद्वारे मतदानाच्या अधिकाराची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मतदानाबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यासाठी तिकिटावर कोटेशन छापण्यात आले होते. परिवहन खात्याने यावेळीही तीच परंपरा सुरू ठेवली असून त्यांच्या परिवहन बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खरेदी केलेल्या तिकिटांमध्ये मतदान जागृती करण्याचे काम करत आहे.