जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अग्निपथ योजनेला विरोध तसेच सफाई कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी जयभीम मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. गेली 25 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून महापालिकेमध्ये काम करत आहेत. आता त्यांचे वय निवृत्तीकडे आले आहे. तरीदेखील त्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले जात नाही. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने देश संरक्षणासाठीची अग्निपथ योजना जारी केली आहे. ती तातडीने मागे घ्यावी. कारण त्यामुळे देशाचे नुकसान होणार आहे. तसेच बेरोजगारी वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुरली चव्हाण, अर्जुन कांबळे, सुभाष चव्हाण, पी. एल. राजपिट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.