ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ घोटाळा असो अथवा वसईचा बीएससीएल घोटाळा, संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागणार आहे. राऊत यांना नवाब मलिकांच्या शेजारी रहायला जावं लागणार आहे, असं म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून, राऊत दाम्पत्याची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यावरुन माध्यमांना प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे पुरावे दिले होते. पण महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण मला विश्वास आहे की, राऊतांना या सगळ्याचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने पाठवलेल्या समन्सला राऊत यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत ते सहकार्य करत नसल्यानं ईडीने आज त्यांच्या घरी छापा टाकल्याचे सांगण्यात येते. राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचेही भाजप नेत्यांकडून सांगण्यात येते.
हेही वाचा : राऊतांवरील कारवाईमुळे आम्ही आनंदी; बंडखोर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया