सरवडे प्रतिनिधी
बिद्रीतील संचालक मंडळाचा भ्रष्ट कारभार व त्यांच्या चुकीच्या कारभाराला पाठीशी घालणारे ऑडीटर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेच लागतील असा इशारा आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिला .नरतवडे (ता.राधानगरी) येथे बिद्री साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर गट क्रमांक एक मधील सभासद व कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रंगराव मगदूम होते.
आमदार आबिटकर म्हणाले, बिद्रीच्या सहवीज प्रकल्पामुळे प्रत्येक वर्षी एफआरपीपेक्षा वाढीव दर मिळणे अपेक्षित होते. पण या रक्कमेतून मिळालेले उत्पन्न सभासदांना न देता नफ्याएवढाच तोटा दाखवून लाटले आहे. शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या लै भारीचा भुलभुलैया आम्ही वास्तव रुपात सभासदांसमोर आणणार आहोत. सभासदांनी वास्तवता जाणून घामाचे दाम पदरात पाडून घेण्यासाठी बिद्रीत परिवर्तन करावे.आमच्या हाती सता दिल्यास शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.
यावेळी मारुतीराव जाधव (गुरुजी) यांनी कारखान्यातील कोट्यवधी रुपयांची खंडित बिले, रोजदांरी पगार ,प्रकल्प खर्च व सग्या सोयऱ्यांची नोकर भरती यासह विविध खात्यातील चुकिच्या कारभाराचे पुरावे दाखवून पंचनामा केला. गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे,दिपक शेट्टी, अशोक फराकटे,,बाबा नांदेकर, सिताराम खाडे ,विकास पाटील, कृष्णात ताशिलदार आदीनी मनोगत व्यक्त केली.
डी. पी .पाटील यांनी स्वागत केले .मेळाव्यास के .जी. नांदेकर अरुण जाधव, दत्तात्रय उगले, सुभाष पाटील, नंदकुमार ढेंगे, सूर्याजी देसाई, संजय पाटील, राजेश मोरे, बाबुराव लाड, कल्याण निकम, ए. बी .पाटील, विजय बलुगडे, विलास डवर,सरपंच सुरेखा गुरव,अजित देसाई,अनिल पाटील, विलास तोवार, राजेंद्र मगदूम, भिकाजी पाटील, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विश्वास आरडे यांनी केले.