विश्वास पाटील/हेरे
गेली दोन वर्ष कोरोना काळात व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची फसगत झाली. काजूला हवा तसा अपेक्षित दर मिळाला नाही. 80 रुपयापासून 110 रुपयापर्यंत गेल्या दोन वर्षात काजूला दर मिळाला. यावषी कोरोना संसर्ग नसून सर्वत्र बाजारपेठा खुल्या आहेत. त्याशिवाय काजू उत्पन्नही कमी आहे. यावर्षी तरी दर चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकरी वर्ग काजू व्यापाऱ्यांकडे विचारपूस करीत आहे.
सध्याचा दर 130 रुपये प्रमाणे किलोला सुरू आहे. याशिवाय दोडामार्ग, गोवा परिसरात 140 रुपये किलो काजू घेतली जात आहे. अपेक्षित दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांची खटपट सुरू आहे. सध्या बाजारपेठेत काजू उत्पादक शेतकरी फक्त दराची चौकशी करत आहे. काजू दर वाढणार असल्याने संघटीत राहून वाढीव दर घेण्याची तयारी दर्शवली आहे. तालुक्यातील पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या काजूला दोन वर्षापूर्वी 160 ते 170 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. आणि गेल्यावषी मात्र या काजूला शंभरीही गाठता आली नाही. वास्तविक पाहता काजू दरामध्ये कुठल्याही स्वरूपाची घसरण झाली नाही. मग कच्चा माल अल्प किमतीत का विकला गेला. असा प्रश्न जागृत शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभरासाठी आधारवड ठरणारा काजू सध्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. गेल्यावषी लॉकडाउन परिस्थिती असल्याने व्यापारीवर्गाने याचा फायदा उचलत काय होईल तो दर देतो, असे सांगून मालाची उचल केली. परिणामी शेतकऱ्यांना वाढीव दर मिळालाच नाही. शिवाय स्वतच्या पैशाकरीता व्यापारी वर्गाच्या घराचे उंबरे झिजवावे लागले. याउलट ज्यांनी अपेक्षित दराची वाट पाहिली आणि काजू घातली.
त्यांनी 120 रुपये दर गेल्यावषी घेतला. यावषी पुन्हा दराबाबत कोंडी निर्माण झाली असून गेल्या वर्षभरात कोरोनामुळे शेतकरी डबघाईला आला आहे. परिणामी अपेक्षित दर नाही मिळाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक गणितच कोलमडणार आहे. गेल्यावषी मोठ्य़ा प्रमाणावर शेतकऱ्यांनी काजू साठवली होती. काजू हाताला लागत नाही, हे ओळखून काही कारखानदारांनी पुढे काय होईल तो दर देतो असे सांगून शेतकऱयांची काजू उचलली होती. बरेच शेतकरी या भूलथापांना बळी पडले. मात्र काय होईल तो दर मिळेल या अपेक्षेचा अनेक काजू उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत वाईट अनुभव आला आहे. सांगितलेली रक्कम अजुनसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही. काही शेतकऱ्यांना थोडे थोडे पैसे देत काही खरेदीदार व कारखानदारांनी फसवणूक केली. काय होईल तो दर देतो असे सांगून 90 रुपयांवर बोळवण केली. आजही शेतकरी व्यापाऱ्यांकडे पैशासाठी चकरा मारत आहेत. त्यांनी काजू ताब्यात घेऊन आपला व्यवसाय बिनभांडवली चालवत शेतकऱ्यांना अंधारात ठेवले. याउलट संघटीत शेतकऱ्यांनी 100 रुपये ते 120 रुपयापर्यंत रोखीने दर घेतला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने चांगला दर व रोखीने व्यवहार करण्याची गरज आहे.सध्याचा दर 130 रुपये प्रमाणे किलोला सुरू आहे.