कबनुर वार्ताहर
कोरोची ( तालुका हातकलंगले ) येथील जलस्वराज्य लेखापरीक्षण सन 2011 ते 2020 पर्यंतचे ऑडिट झालेच पाहिजे या मागणीसाठी ग्रामपंचायत समोर कोरोची जलस्वराज बचाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झाली. आताचे ऑडिट आम्हांला मान्य नाही यासह विविध मागण्यासाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.जलस्वराज्य नाही कुणाच्या बापाचं हिशोब गावकऱ्यांच्या हक्काचं, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.
सन 2011 ते 2020 पर्यंतचे लेखापरीक्षण झालीच पाहिजे. यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत व बि.डी.ओ यांच्याकडे लेखी तोंडी प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली पण त्या बाबतची कार्यवाही करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबतचे निवेदन देऊन जर अहवाल प्राप्त न झाल्यास येत्या 2 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून ग्रामपंचायत मध्ये बैठक घेतली. बैठकीत कोणताही ठाम निर्णय न झाल्याने कृती समितीने दोन तारखेपासून आपला साखळी उपोषण चालू ठेवणार यावर ठाम राहिले.
दरम्यान बैठकीत जलस्वराज्य योजनेची लेखा परीक्षण झाल्याबाबतची फाईल यापूर्वी ग्रामपंचायतच्या तिजोरीमध्ये असल्याचे निदर्शनास आले नाही पण गेल्या चार महिन्यापूर्वी अचानकपणे ती फाईल कामगारांच्या निदर्शनास आली. नेमकी ही फाईल आली कशी मी ठेवली असे सवाल करत त्यांच्यावर भडीमार केला व त्या कामगाराने ती फाईल कुणाच्या सांगण्यावरून ठेवली याबाबत संबंधितांवर कार्यवाही व्हावी. व लेखापरीक्षण मध्ये जे कोणी दोषी आढळून आलेस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणी साठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले. या साखळी उपोषणात माजी सरपंच संजय खारकांडे , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख व माजी उपसरपंच आनंदा शेट्टी , मा. जि.प.सदस्य देवानंद कांबळे , संजय कदम , संतोष वाघेला , माजी सरपंच सुहास पाटील , दीपक तेली ,अमर कोरोचीकर , दारासिंग सागरे , शीतल पाटील , सुनील आवळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सात सदस्य उपस्थित होते.
यावेळी या उपोषणास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे , यांनी पाठिंबा जाहीर केला