१५ मे पर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा, पाणी पुरवठा करण्याची पत्राद्वारे मागणी
कळंबा : प्रतिनिधी
कळंबा तलावातील पाण्याची पातळी खालावल्याने कळंबा गावावरती पाणी टंचाईचे संकट उद्भभवणार असे दिसत आहे . पुढील १५ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे त्यामळे १५ मे नंतर गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतीची चाचपणी सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातुन कळंबा गावाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी महापलिकेला पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात म्हंटले आहे की पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा होतो. या तलावातील पाण्याचा कळंबा गावसह शहरातील काही भागाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो मात्र मे च्या पहिल्या आठवड्यातच तलावातील पाण्याची पातळी १२ फुटांवर आल्याने पाणी झपाट्याने कमी होत असल्याने कळंबा गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असलेने ग्रामपंचायतीने पाण्यासाठी महापालिकेला पत्र व्यवहार केला आहे. तलावातील पाण्याची पातळी सध्या १२ फुटांवर राहिली आहे. त्यापैकी जलचर प्राण्यासाठी ७ ते ८ फुट पाणी पातळीची गरज असते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कळंबा गावास पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तसेच कळंबा तलावाचे पाणी हे फक्त कळंबा गावासाठी वापरले असता कळंबा गावाला १५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यानंतर कळंबा गावास तीव्र पाणी टंचाई भासणार आहे.
सदर टंचाई काळात पिण्याचे पाण्याची उपाय योजना करणेसाठी कोल्हापूर महानगर पालिकेकडील पुईखडी जल शुद्धीकरण केंद्र येथून कळंबा गावापर्यंत पाईपलाईन जोडलेली आहे. या ठिकाणावरून ही पाणी टंचाई काळात महानगरपालिकेकडून या पूर्वीही कळंबा गावाला पाणी पुरवठा केला आहे. त्याप्रमाणे या काळात महापलिकेमार्फत १० मे पासून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने मनपाकडे केली आहे.