टोप / वार्ताहर
पन्हाळा तालुक्यातील गिरोली ते केखले दरम्यानच्या घाटात, वनविभागाने उभारलेल्या मनोऱ्याच्या जवळ असलेल्या गर्द झाडीत 20 गव्याच्या कळपा चे दर्शन केखले गावचे ग्रामस्थ सचिन सर्जेराव पाटील व सरपंच हंबीराव चौगुले यांना सकाळी साडेसहा च्या दरम्यान सकाळी फिरायला गेले असता झाले.
गिरोली ते केखले घाट मार्ग आहे. या मार्गावर गर्द झाडी आहे. केखले व गिरोलीतील काही ग्रामस्थ सकाळी फिरायला जातात.आज सकाळी गर्द वनराई जवळच पिलासह 20 गव्याचा कळप चरताना दिसला. सादळे, मादळे, मनपाडळे,कासारवाडी, अंबपवाडी,या परिसरात गव्याचा वावर अनेक दिवसापासून आहे.या परिसरात मुबलक चारा पाणी आहे. तर गव्यांचा वावर असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे.या बाबत परिसरातील डोंगरालगत असणाऱ्या जमिनीतील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून वारंवार असे गव्या कडून होत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केखलेचे सरपंच हंबीरराव चौगुले यांनी केली आहे.