मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकिला निमंत्रण असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बहीष्कार टाकला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यांनी हे आमंत्रण दिले होते. एफआरपीची दोन तुकड्यामध्ये केलेली विभागणी आणि जमिन अधिग्रहण कायद्यातील तरतुदीवर महाविकास आघाडीवर असलेल्या नाराजीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतल्याचे राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
मुंबईमध्ये उद्यापासून होत असलेल्या इंडीया आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाही होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे निमंत्रण दिले होते. पण मुंबईच होत असलेल्या इंडिया आघाडीच्या महत्वपुर्ण बैठकीला राजू शेट्टी यांनी बहीष्कार टाकला आहे. निमंत्रण असूनही राजू शेट्टींचा बैठकिला हजर राहण्यास नकार दिला.
माध्यमांनी राजू शेट्टींच्या या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात घेतलेल्या काही निर्णयामुळे मी नाराज आहे. महाविकास आघाडी काळात दोन तुकड्यात एफआरपी देण्याचा निर्णय झाला. त्याच बरोबर जमिन अधिग्रहण कायद्यात मोडतोड करून जमिनीचा मोबदल्या मोबदल्यावरही महाविकास आघाडीने योग्या भुमिका घेतली नाही.”असा खुलासा त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या संदर्भात मी स्वत: शरद पवार यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. या दोन्ही मुद्दयांवर महाविकास आघाडीला बैठकही घेऊ वाटली नाही. तसेच महाविकास आघाडीचा कोणताही नेत्याने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे इंडिया ही आघाडी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कशी काय गृहीत धरत आहे.” असा सवालही त्यांनी विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या नविन आघाडीमधील काही पक्षांनी एमएसपी साठी लेखी पाठींबा दिला होता. पण त्यांनी कधी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा प्रचारांमध्ये उल्लेख केला नाही. तसेच अजूनही अशी थेट भुमिका इंडिया आघाडीने जाहीर केलेली नाही.” असेही ते म्हणाले.