कोल्हापूर: कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी बालिंगा पाणी उपसा केंद्रातील पाईपलाईन पुन्हा एकदा तुटली आहे. आज सकाळी बालिंगा उपसा केंद्र ते चंबुकडी दरम्यान असणारी मेन पाईपलाईन फुटल्याने कोल्हापुरातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याबद्दल अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. दरम्यान पाईपलाईन फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बालिंगा उपसा केंद्रातून चंबुखडी येथे पाईपलाईन द्वारे पाणी आणले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून याला गळती असल्याने ते काम मागील दोन दिवसात करण्यात आले. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा ही पाईपलाईन बनुगडे मळा येथे कुठली आहे. जवळपास पंचवीस ते तीस फुटांवर पाण्याचे फवारे उडत आहे. दरम्यान ही बाब लक्षात येताच या पाईपलाईन बंद करण्यात आले. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून शेतात पाणी साचून होते. काल हे गळतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतातील काम पूर्ण होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा पाइपलाइन फुटल्याने त्याचे पाणी संपूर्ण शेतात साचले आहे. एकीकडे उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना कोल्हापूर शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र दुसरीकडे पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून महापालिकेस समोरील आव्हान वाढले आहे. दरम्यान, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच शेतीचे झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.