खानापूर आघाडीवर, बाजारपेठेला स्थानिक आंब्याची प्रतीक्षा : हवामानाच्या बदलाचा उत्पादनावर परिणाम
बेळगाव : फळांचा राजा हापूस बाजारात हळूहळू दाखल होऊ लागला आहे. मात्र म्हणावी तशी आवक नसल्याने दर आवाक्मयाबाहेर गेले आहेत. महाराष्ट्रातून आंबा दाखल होत असला तरी स्थानिक आंबा दाखल झाल्यानंतर दरात काहीशी घसरण होईल, अशी आशा आंबाप्रेमींना आहे. यंदा जिल्ह्यात 2860 हेक्टरात आंबा उत्पादन होणार आहे. त्यामुळे स्थानिक आंबादेखील बाजारपेठेत पाहायला मिळणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे फळबाजारावर परिणाम झाला होता. दरम्यान आंबाप्रेमींना मनाप्रमाणे खरेदी करता आली नव्हती. मात्र यंदा बाजार सुरळीत सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये आंबा खरेदीला वेग येणार आहे. गतवषी आंबा उशिराने फळबाजारात दाखल झाला होता. दरम्यान आवकदेखील कमी होती. यंदा आंबा वेळेवर दाखल झाला असला तरी फळबाजारात म्हणावी तशी आवक नाही. त्यामुळे दरदेखील भरमसाट आहेत.
जिल्ह्यात आंबा उत्पादनात खानापूर तालुका आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कित्तूर, बेळगाव, सौंदत्ती, बैलहोंगल, अथणी तालुक्मयात उत्पादन घेतले जाते. अलिकडे बागायत शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक शेतकरी बागायत शेती करू लागले आहेत. त्यामुळे फळ उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. आधुनिक यंत्रे आणि सरकारी योजना यामुळे साहजिकच फळ उत्पादनात समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. फळबाजारात कोकणातील मालवण आणि रत्नागिरीतून आंबा दाखल होऊ लागला आहे. त्याबरोबर येत्या काही दिवसात स्थानिक आंबादेखील दाखल होईल, त्यानंतर आंब्याचे भाव काहीसे कमी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 2860 हेक्टरात आंबा उत्पादन घेतले जाते. त्यापैकी खानापूर 1256, कित्तूर 871, बेळगाव 401, सौंदत्ती 73, बैलहोंगल 68, अथणी 64, गोकाक 15, हुक्केरी 24, कागवाड 11, मुडलगी 5, निपाणी 2, रायबाग 8, रामदुर्ग 38 हेक्टरांत आंबा उत्पादन घेण्यात येते. यामध्ये तोतापुरी, केसर, हापूस, कलमी, मल्लिका आणि ऐश्वर्या जातीच्या आंब्याचा समावेश आहे.
फ्रूट मार्केटमध्ये आंब्याच्या आवकेत वाढ
बेळगाव किरकोळ बाजारात आंबा कमी प्रमाणात दिसत असला तरी फ्रूट मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध भागातून आंबा येऊ लागला आहे. यंदा बदलत्या हवामानाचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.
आंबा महोत्सव भरवला जाणार
गतवषीच्या तुलनेत यंदा आंब्याला पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. शिवाय स्थानिक आंबा उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, यासाठी आंबा महोत्सव भरवला जाणार आहे. जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन हळूहळू वाढू लागले आहे.
– महांतेश मुरगोड (सहसंचालक, बागायत खाते)
फळबाजारात आंब्याची आवक वाढली
य् ाsत्या काळात आंबा आवक वाढेल, असा विश्वास फळविक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. दर अधिक असल्याने सर्वसामान्यांची निराशा होत आहे. सुरुवातीच्या काळात हापूसला मागणी अधिक असते. त्यामुळे दरही चढे असतात. मात्र, शेवटच्या टप्प्यात आंब्याचे दर घसरतात. त्यामुळे काही जण एप्रिल-मे दरम्यान आंबा खरेदीला पसंती देतात.