आमदार जयश्री जाधव यांची ग्वाही : स्व. आमदार चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न पूर्ण करणार : मराठा महासंघाचा समाज मेळावा उत्साहात : हेरवाड, माणगाव ग्रामस्थांच्या अभिनंदनासह विविध ठराव मंजूर
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये मराठा भवन उभारण्याचे स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे. लवकरच मराठा भवन साकारण्यात येईल, अशी ग्वाही कोल्हापूर उत्तरच्या नूतन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये समाज मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये वधू-वर मेळावाही झाला. विविध वक्त्यांनी मार्गदर्शन करताना मराठा समाजाने कालबाहय़ झालेल्या रूढी, परंपरांना छेद देवून शैक्षणिक विकासाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केले.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोल्हापुरात मराठा भवन उभारण्याचे स्वप्न होते. दुर्दैवाने त्यांचे अकस्मिक निधन झाले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आवश्यक त्या पूर्तता केल्या जातील.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाज महाराष्ट्रात एखाद्या महासागराप्रमाणे आहे त्याला संघटीत करणे सोपे नाही. जिह्यात प्रत्येक समाजाची भवन आहेत पण कोल्हापूर जिह्यात 50 टक्क्यां पेक्षा जास्त असणाऱया मराठा समाजचे भवन नाही. मराठयांच्या राजधानीत मराठा भवन नाही ही खदखद मराठा समाजात आहे, तरी राज्य शासनाने आय टी पार्क शेजारचा प्रस्ताव मान्य करुन भूखंड द्यावा.
‘तरुण भारत’चे मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांनी मराठा समाजातील विषमतेवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठा समाज सध्या एका विशिष्ट वळणावर आला आहे. तो जर वेळीच जागा झाला नाही तर पुढची पिढी अडचणीत यायला वेळ लागणार नाही. मराठा समाजाने संघटीत होण्याबरोबर शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खाडे यांनी केले.
स्वागत जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले. प्रास्ताविक चंद्रकांत चव्हाण यांनी केले. यावेळी दत्तात्रय पाटील, उत्तम जाधव, प्रकाश पाटील, संयोगीता देसाई, नीलम मोरे, अशोक देशमुख, राजू परांडेकर, सचिन इंगवले, संगीता राणे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. वधूवर मेळाव्यात 135JeOet-Jejeb®eer नोंदणी झाली. वाचन, ओळख मंचावर सहभागी वधू-वरांनी स्वतः करुन दिली.
या मेळाव्यात मंजूर केलेले ठराव असे-
1) जन्म कुंडलीचे अवंडबर नको, शिक्षण व कर्तुत्वाला महत्व द्या.
2) 96 कुळीचा बाजू नको, समाजामध्ये भेदाभेद करू नका.
3) विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्यभर जनजागृती करणार.
4) कर्ता पुरुष गेलेल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे.
5) विधवा प्रथा बंद केल्याबद्दल हेरवाड ग्रामस्थांचे अभिनंदन, आभार. आर्थिक
6) आर्थिक स्त्राsत नसलेल्या विधवेच्या कुटुंबाला 1 वर्षाच्या पाणीपट्टी व घरफाळा सुट देण्याचा सन्मान ठराव करणाऱया माणगाव ग्रामसभेचे अभिनंदन.
4) राज्य शासनाने मराठा समाजाच्या स्वराज्य भवनासाठी तातडीने जागा द्यावी.
5)pevceeheemetve मृत्यूपर्यंत अनेक अनाठायी रूढी परंपरांना तिलांजली देण्यासाठी आदर्श आचारसंहिता स्वीकारून विज्ञाननिष्ठ बना.