मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र ही लढाई आरपारची म्हणत जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे.याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही दिसत आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत.
राधानगरी येथे सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण,दुसऱ्या दिवशी उपोषणाला प्रतिसाद
मराठा समाजला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली (जालना) येथे सुरु असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राधानगरी येथे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकल मराठा समाजाच्या वतीने कालपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशी सकाळ पासून मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावून समर्थतता दर्शवली, यावेळी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको, गाव बंद, तिरडी मोर्चा, मशाल मोर्चा, आरक्षण जनजागृती आदी विविध आंदोलने करण्याच्या यावेळी निर्णय घेण्यात आला. आंदोलन प्रसंगी शहरवासीयांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन येथे साखळी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगितले.यावेळी सुधाकर साळोखे,प्रा, पी एस पाटील, दिपक शिरगावकर, सचिन भाटळे कुलदीप पालकर, युवराज पाटील, राकेश केरकर, चंद्रशेखर कांबळे अमित पाटील, बाळासो कळमकर, अमित लिंग्रस, अमर वाडकर, आकाश घाटगे यांच्यासह शालेय विद्यार्थी व मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.