द्रौयादरम्यान केपेवासियांचे पाण्यासाठी होणारे हाल आणले समोर
पणजी : राज्यात बीजेपी सरकारकडून विकासाची कामे केली जात असल्याचे वारंवार सांगितले जाते. बीजेपी सरकार हे गोव्यातील जनतेला ठप्रशासन तुमच्या दारीठ, ठहर घर जलठ म्हणून स्वत:चा प्रचार प्रसार करतात. मात्र राज्यातील गावागावात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. रेव्होलुशनरी गोवन्सकडून सरकारच्या या खोटारडेपणाचा वारंवार पर्धापाश करण्यात आज आहे. सध्या सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर यांचा वेगवेगळ्या मतदारसंघात दौरा सुऊ आहे. गावागावात जावून ते लोकांची समस्या जाणून घेत आहेत. दोन दिवसापूर्वीच ते केपे मतदारसंघात गेले असता तिथल्या मोरपिर्ला, सुबदळे, शेल्डे सारख्या गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे पाहायला मिळाले. घरोघरी पाणी साठविण्यासाठी ठेवलेली बरल्स पाहायला मिळत होते. टँकरची सुविधा सुद्धा अनियमित असल्याने, गावातील महिलांना तीन – चार किलोमीटर चा पायी प्रवास करून झरीचे पाणी आणावे लागत असल्याचे निदर्शनास आले. राज्यातील बीजेपीचे हे डबल इंजिन सरकार खोटा प्रचार प्रसार करून, फक्त लोकांची दिशाभूल करत असून, केपे मतदारसंघातील अनेक गावांना ठहर घर जलठ सोडाच साधं गावांना पाण्याच्या पाइपलाइन ची जोडणी झालेली नाही. त्याचबरोबर सरकारकडून टँकरची सुद्धा सुविधा मिळत नसून, सरकारने आजपर्यंत मोठी लोकवस्ती असलेल्या अशा गावातील लोकांना पाण्यापासून वंचित का ठेवले आहे असा प्रश्न विरेश बोरकर यांनी यावेळी उपस्थित केला. रेव्होलुशनरी गोवन्स पक्ष आपल्या परीने गोवेकरांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करत राहणार असून, सरकारवर दबाव आणून लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांचे हक्क, त्याचबरोबर त्यांना पाण्याबरोबर इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे विरेश बोरकर म्हणाले.