सुरक्षा दलाकडून अश्रुधुराचा वापर : 10 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये जमावाने पुन्हा एकदा पोलीस स्थानक आणि न्यायालयांवर हल्ले केले. यावेळी सुरक्षा दलांनी आंदोलकांना हुसकावण्यासाठी अश्रुधुराचा वापर केल्यामुळे झालेल्या संघर्षात 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 16 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या पाच तऊणांची बिनशर्थ सुटका करण्याची मागणी आंदोलक करत होते. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने संध्याकाळी 5 वाजल्यापासून इंफाळच्या दोन्ही जिह्यांतील संचारबंदीमधील शिथिलता रद्द केली आहे.
सहा स्थानिक क्लब आणि मीरा पाबीसच्या आवाहनानंतर शेकडो आंदोलक फलक घेऊन रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करू लागले. या लोकांनी इंफाळ पूर्वेतील पोरोम्पॅट पोलीस स्थानक आणि इंफाळ पश्चिम जिह्यातील सिंगजामेई पोलीस स्थानक आणि क्वाकिथेल पोलीस चौकीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि आरएएफच्या जवानांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या.