मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती : हैद्राबाद येथे केंद्रीय खाण खात्याची परिषद
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील खनिज व्यवसाय बंद झाल्याने गोव्याच्या अर्थ व्यवस्थेवर जबरदस्त परिणाम झाला आहे. सरकारने खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना शक्य तेवढा मदतीचा हात दिलाय. आत्ता खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
हैद्राबाद येथे आयोजित केलेल्या केंद्रीय खाण खात्याच्या परिषदेत मंत्री सुभाष फळदेसाई सहभागी झाले होते. केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 व 10 रोजी सप्टेंबर रोजी ही परिषद झाली. परिषदेत गोव्याचे प्रतिनिधीत्व मंत्री फळदेसाई यांनी केले.
गेल्या दहा वर्षापासून राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने राज्याची तशीच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती कोलमडून गेली आहे. बेरोजगारीत वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्यातील खाणी त्वरित सुरू कराव्यात, अशी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी परिषदेत केली, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्यात मिळणाऱया लोह खनिजाची ग्रेड 52 ते 56 असल्याने त्याचा उपयोग देशात होणार नसल्याने हा माल विदेशात निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने मोकळीक द्यावी अशी मागणीही फळदेसाई यांनी केंद्रीय मंत्री जोशी यांच्याकडे केली आहे. केंद्रीय नियमानुसार 62 ग्रेड असलेल्या खनिजाचा वापर देशातच करावा जेणेकरून देशातील उत्पादकांना याचा लाभ मिळेल असेही ते म्हणाले.
गोव्यासाठी निर्यात शुल्क रद्द कराण्याची मागणी
गोव्यातील माल कमी ग्रेडचा असल्याने या मालाची बोली कोणीच लावणार नाही. याचा विचार करून केंद्र सरकारने लोह खनिज निर्यात करण्यासाठी 50 टक्के जो निर्यात शुल्क लावण्यात आला आहे. तो रद्द करून शून्य टक्क्मयांवर आणल्यास याचा फायदा गोव्याला होईल. राज्यातून परदेशात निर्यात करण्यासाठी आमच्याकडे जलमार्गाचा चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
जलमार्गांचाही फायदा मिळणार
जलमार्गाचा फायदा राज्यातील या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना होणार आहे. निर्यात शुल्कात शिथिलता आणली नाही तर लोह खनिज निर्यातही करता येणार नाही तसेच त्याचा वापर देशातही होणार नसल्याने केंद्र सरकारने यावर राज्यातील जनतेचा विचार करून निर्यात शुल्क शून्य टक्क्मयांवर आणावे अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.
गोव्यातील खाण व्यवसाय वेगळा
गोवा व इतर राज्यात होणारा हा व्यवसाय पूर्णपणे वेगळा असून बाकी राज्यात कोळसा, चुना व इतर खाण व्यवसाय केला जातो. पण गोव्यात फक्त लोह खनिज खाणीच असल्याने प्रतिवषी जी मर्यादा घालून दिली आहे, ती लोकांचे हित डोळय़ासमोर ठेवून काढावी व दुसरी मर्यादा घालून द्यावी अशीही मागणी मंत्री फळदेसाई यांनी केंद्र सरकारकडे या परिषदेच्या माध्यमांतून केली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यातील समस्या ऐकून घेतल्या असून हा व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व ते सहकार्य करणार असल्याचे सांगून खनिजांचा लिलाव करण्यासाठी टप्याटप्याने हे काम पुढे नेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
राज्यातील खाण व्यवसाय लवकर सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली असून किती लोह खनिजाचा लिलाव केला जाऊ शकतो, याची पडताळणी करण्यात येणार असून हे काम पूर्ण करण्यासाठी वेळेचेही बंधन घालून देण्यात आले असल्याने राज्यातील हा व्यवसाय लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास मंत्री फळदेसाई यांनी व्यक्त केला आहे. या महत्वपूर्ण बैठकीला देशातील विविध मुख्यमंत्री, खाण खात्याचे मंत्री, मुख्य सचिव, संयुक्त सचिव व इतर मान्यवर उपस्थित होते.