पुरुषांना पाळावे लागतात महिलांचे आदेश
भारतात प्रामुख्याने आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृती दिसून आली आहे. परंतु भारतात एक असा समुदाय आहे, ज्यात महिलांचे प्रभुत्व दिसून येते. भारतातील बहुतांश भागांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती नांदत असते, सासरी आल्यावर मुलींना अनेक नव्या गोष्टींबाबत तडजोड करावी लागते. परंतु भारतातील दोन राज्यांमध्ये राहत असलेल्या समुदायात महिलांचे वर्चस्व चालते. ईशान्येतील मेघालय आणि आसाममध्ये हा आदिवासी समुदाय राहतो.
मेघालय आणि आसाममध्ये राहणाऱया समुदायाचे नाव खासी आहे. या समुदायात मुलांच्या जागी मुलींना अधिक सन्मान असतो. या समुदायात महिलांचे वर्चस्व असून त्यांच्या म्हणण्याला अधिक महत्त्व दिले जाते. भारतासह बांगलादेशात खासी समुदायाचे वास्तव्य आहे. या समुदायाचे लोक मुलांच्या जन्मानंतर आनंद जल्लोष करत नाहीत. तर मुलींच्या जन्मानंतर आनंद व्यक्त करतात. यात कुटुंब प्रमुख महिला असतात. कुटुंबात अंतिम निर्णय महिलाच घेत असतात.
विवाहानंतर खासी समुदायात मुलगा स्वतःचे आडनाव बदलतो. तर मुलांची नावे आईच्या आडनावावर ठेवली जातात. सर्वसाधारणपणे भारतात विवाहानंतर मुलींना सासरी जावे लागते. परंतु या समुदायात नवरा मुलगा मुलीच्या घरी राहण्यासाठी जातो.