वनखात्यातील प्रकार : अनेक झाडांकडे दुर्लक्ष
बेळगाव : ‘झाडे लावा देश वाचवा’चा संदेश सध्या देशभरात फिरू लागला आहे. या दृष्टिकोनातून तालुक्मयातही पावसाच्या तोंडावर विविध योजना राबविल्या जाणार आहेत. उद्योग खात्री योजनेतून यावषी तालुक्मयात 40 हजारहून अधिक रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वेळीही उद्योग खात्री योजनेतून हजारो रोपे लावण्यात आली होती. यावषीही आता ही मोहीम राबविण्यात येणार असली तरी यामधील किती रोपे जगतात, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. त्यामुळे झाडे लावली तरी ती जगविण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे. रोपांची होणारी कत्तल आणि तापमानात होणाऱ्या वाढीमुळे भविष्यात हे संकट मोठे असणार यात शंका नाही. त्या दृष्टिकोनातून पावसाळ्यापूर्वी किमान प्रत्येकाने एक तरी रोप लावले पाहिजे, असा नारा देण्यात येत आहे. विकसित शहराचा विकसित पाया हे तेथील पर्यावरण असते. त्यामुळे सध्या तालुक्मयात 40 हजारांहून अधिक रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. रोप तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून लाखो ऊपये देण्यात येतात. मात्र, तो निधी योग्यप्रकारे वापरण्यात येतो का? रोपनिर्मिती आणि लागवड ही दोन्ही कामे होत असली तरी किती प्रमाणात ही रोपटी जगविली जातात? काही बडे नेते तर फोटोसाठी रोप लागवडीचे ढोंग करून प्रसिद्धी मिळाली की त्याच झाडांवर कुऱ्हाड आणण्याचा घाट घालत असतात. जेथे रोपटी निर्माण केली जातात आणि जेथे ती लावण्यात येतात त्यासाठी काही तरी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.