ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी मी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांना प्रचंड अहंकार होता. यावेळी आम्हा दोघांमध्ये शाब्दीक चकमकही झाली, असा दावा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
हरियाणातील दादरी येथे एका सामाजिक कार्यक्रमाला संबोधित करताना सत्यपाल मलिक यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, जेव्हा मी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना प्रचंड अहंकार होता. मी त्यांना सांगितले की, आंदोलनादरम्यान आमचे 500 शेतकरी मृत्यूमुखी पडले. तेव्हा ते म्हणाले की, ते माझ्यासाठी मेलेत का? मी म्हणालो, ते तुमच्यासाठीच मेले आहेत, कारण तुम्हीच राजा बनला आहात. यावेळी आम्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्यांनी मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला सांगितले. त्यानंतर मी अमित शाह यांची भेट घेतली.