राधानगरीमध्ये शासन आपल्या दारी सेवा महिना शुभारंभ
राधानगरी / महेश तिरवडे
महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासनाच्या सर्व विभागांनी लोकांपर्यंत जाऊन चांगलं काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करीत,सर्व पात्र लाभार्थींपर्यंत योजना पोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार प्रकाश अबीटकर यांनी केलं.ते राधानगरी येथे अंबाबाई मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग राधानगरीच्या वतीने शासन आपल्या दारी सेवा महिना राबवण्यात येत आहे.राधानगरी येथे आमदार प्रकाश अबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थींना विविध योजनाचे मंजुरी पत्र,लाभाचे धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांनी मातोश्री पानंद आणि पालकमंत्री पानंद योजनेतून गावागावातील पानंदि चांगल्या करण्यासाठी उठाव करूया,शासनाच्या सर्व योजना लाभार्थींपर्यंत पोचवण्यासाठी विभागवार मेळावे घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी मिरज येथे झालेल्या अपघातात मयत झालेले जयवंत पोवार यांच्या वारसास मुख्यमंत्री सहाय्यतानिधीतुन 18 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तसेच पिकांचे गव्याकडून फस्त झालेल्या नुकसानीचे 1 लाख 8 हजार रुपये 20 शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आला तहसीलदार अनिता देशमुख,राधानगरी तालुका संजय गांधी समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे,अशोक फराकटे,वनक्षेत्रपाल सुहास पाटील, साईनाथ तायनाक,अभियंता शिवाजी इंगवले, प्रविण पारकर,डॉ गणपती गवळी,मंडल अधिकारी सुंदर जाधव,संग्राम पाटील,अनिल बडदारे,आनंदा शिंदे,दीपक शेट्टी, फारुख नाळवेकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.